अमर,अकबर,अँथनी यांची तीन दिशेला तीन तोंड, रावसाहेब दानवे यांनी साधला पुन्हा ठाकरे सरकारवर निशाणा

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्षातील नेते आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. त्यातच आता पुन्हा एकदा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आघाडी सरकारवर निशाणा साधला होता.

हे तीन पक्षांचं सरकार आहे. यांच्यात ताळमेळ नाहीये. हे एकमेकांच्या पायात पाय घालून पडणारं सरकार आहे. अमर,अकबर,अँथनी यांची तीन दिशेला तीन तोंडं आहेत. हे सरकार आपापसांतच भांडून पडेल. आम्हाला हे सरकार पाडण्यासाठी काही करण्याची गरजच नाही, अशी टीका मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे.

दानवे यांनी महाविकास आघाडी सरकारला अमर, अकबर, अँथनी अशी उपमा दिली आहे. ते म्हणाले, सिनेमा कितीही खराब असला आणि एकदा तिकीट काढलं, तर माणसांना पूर्ण वेळ बसावंच लागतं. पण कधीकधी प्रेक्षकांमध्ये प्रक्षोभ झाला, तर अनेक चित्रपट बंद पडताना पाहिलेत. आम्ही त्यांच्या चांगल्या कामांना पाठिंबा देऊ, वाईट कामांना विरोध करू असे विधान सुद्धा दानवे यांनी केले होते.

Team Global News Marathi: