” अजित पवारांसारखा वेळ पाळणारा दुसरा माणूस नाही, पण… ” ; चंद्रकांत पाटलांचा टोला

 

एमपीएससीची लेखी परीक्षा उत्तीर्ण होउन दोन वर्ष पदे न भरल्याने स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याने पुण्यातील फुरसुंगी येथे राहत्या घरी आपले जीवन संपवले होते. यावररूनच आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला आहे.

अजित पवारांसारखा वेळ पाळणारा आणि शब्दाला जागणारा दुसरा माणूस नाही अशी ओळख आहे. पण आता एमपीएससीच्या जागा भरण्याबाबत विधिमंडळात दिलेला शब्द जर ते फिरवत असतील तर मग कठीण आहे, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांना जोरदार टोला लगावला आहे.

पुण्यात चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी पाटील म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विधिमंडळ ३१ जुलैपर्यंत एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार असल्याची घोषणा केली होती. मात्र आता ते जर आपण दिलेल्या शब्दावरून पलटी मारत असतील तर मग कठीण आहे. असे प्रत्येक विषयातच त्यावेळची वेळ मारून नेण्याचे काम महाविकास आघाडी सरकारकडून सातत्याने सुरु आहे. हे अत्यंत खोटारडं सरकार आहे. निवडणूक होईपर्यंत हे सर्व चालतं, पण नंतर कळतं. महाविकास आघाडी सरकारला लोक धडा शिकवतील असे विधान त्यांनी पत्रकार परिषदेत केले होते.

Team Global News Marathi: