देगलूरच्या विजयानंतर अशोक चव्हाण यांना थेट पक्षनेतृत्व सोनिया गांधी यांचा फोन केले अभिनंदन

नांदेड | देगलूर पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसच्या जितेश अंतापूरकर यांनी भाजपच्या सुभाष साबणे यांचा पराभव करून दणदणीत विजय मिळवला आहे. हा विजय शक्य झाला काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांच्या नियोजनाने आणि त्यांच्या परिश्रमाने…!

कालच्या विजयानंतर अशोक चव्हाण यांना महाविकास आघाडीच्या शीर्षस्थ नेत्यांनी फोन केला. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनी पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशोक चव्हाण यांना फोन करुन देगलूरच्या विजयाबद्दल त्यांचं अभिनंदन केलं.

काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या देगलूर बिलोली पोटनिडणुकीमध्ये अशोक चव्हाण आणि भाजपच्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अशोक चव्हाण यांनी प्रचारासाठी तब्बल महिनाभर नांदेडमध्ये तळ ठोकला होता. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज्यातील भाजप नेत्यांची फौज देगलूरमध्ये उतरवली होती. मात्र, काँग्रेस उमेदवार जितेश अंतापूरकर यांनी भाजपच्या सुभाष साबणेंना पराभूत करत विधानसभेत धमाकेदार एन्ट्री केली.

देगलूरचा निकाल दुपारी ३.३० च्या आसपास स्पष्ट झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अशोक चव्हाण यांना फोन करुन त्यांचं अभिनंदन केलं. गेल्या महिनाभर केलेल्या कष्टाचं चीज झाल्याच्या भावना अशोक चव्हाण यांनी व्यक्त केल्या. सोनिया गांधी यांनी जितेश अंतापूरकर यांच्या राजकीय आयुष्याला शुभेच्छा देताना चांगलं काम कराल, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

या संदर्भात माहिती देताना अशोक चव्हाण ट्विटमध्ये म्हणतायत की काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांनी देगलूरच्या विजयानंतर दूरध्वनी करून विजयी उमेदवार जितेश अंतापूरकर व सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी दुपारीच शुभेच्छा दिल्या होत्या. तीनही नेत्यांचा मी आभारी आहे. असे त्यांनी ट्विट केले आहे

Team Global News Marathi: