आदित्य ठाकरेंनी आजोबांची नक्कल करू नये …. शहाजी बापू पाटलांचा सल्ला

 

शिवसेना नेते संजय राऊत यांना रविवारी रात्री उशिरा ईडीने अटक केली. यानंतर सोमवारी त्यांना कोर्टाने ४ ऑगस्टपर्यंतची ईडी कोठडी सुनावली आहे. पत्राचाळ घोटळाप्रकरणी ईडी सध्या राऊतांची चौकशी करत आहे.

शहाजी बापू पाटील यांनी राऊतांचा समाचार घेतला. राऊत म्हणजे भोंगा नाही, तर राज्याला लागलेली किरकिर होती, असा टोला त्यांनी लगावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोला लगावताना आता रोज सकाळी वाजणारा भोंगा बंद पडला, असं म्हटलं होतं. याच मुद्द्यावर बोलत पाटील यांनीही राऊतांवर निशाणा साधला.

यासोबतच त्यांनी आदित्य ठाकरेंनाही सल्ला दिला. राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर आदित्य ठाकरेंनी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जात शिवसैनिकांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. ते बंडखोर आमदारांवर सडकून टीकाही करत आहेत. यादरम्यान पाटील यांनी आदित्य ठाकरेंना एक सल्ला दिला आहे.

Team Global News Marathi: