‘त्या’ लग्नाच्या फोटोबाबत समीर वानखेडेंचं मालिकांना सडेतोड प्रतिउत्तर

 

मुंबई | एनसीबी अधिकारी समीर वानखडे मुंबई क्रुझ रेव्ह पार्टीवर छापेमारी करताना अटक केली आहे. आर्यन खान याला ड्रग्जचं सेवन करत असल्याचा आरोप एनसीबी’ने केला आहे. या प्रकरणानं सध्या राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच आता समीर वानखेडे यांच्या विरोधात नवाब मलिक मैदानात उतरले आहे.

समीर वानखेडे यांनी बॉलिवूडला बदनाम करण्यासाठी कारवाईचा धडाका लावला आहे. इतकचं नाही तर बॉलिवूडमध्ये दहशत पसरवून वसुली करत असल्याचा आरोपही नवाब मलिकांनी केला होता. त्यावर समीर वानखेडे यांनी मलिकांविरोधात कायदेशीर कारवाई करू असा इशारा दिला होता.

मात्र दुसरीकडे मलिकांनी समीर वानखेडे यांच्या लग्नाचा जुना फोटो शेअर करत पहचान कौन असं म्हणत वानखेडेंवर पुन्हा निशाणा साधला आहे. या ट्विटला उत्तर देताना वानखेडे म्हणाले की, २००६ मध्ये माझं लग्न झालं होतं आणि कायदेशीररित्या घटस्फोट घेऊन मी दुसरं लग्न केलं, ज्या महिलेसोबत मी संसार केला नाही त्या महिलेचा फोटो वापरून कुटुंबावर हल्ला केला जातोय अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Team Global News Marathi: