नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या संसर्गाने आपले हातपाय पसरायला सुरवात केली आहे. तर दुसरीकडे बेरोजगारी सुद्धा देशात वाढताना दिसत दिसत आहे. आज कोरोनाच्या संसर्गामुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी मागच्या अनेक दिवसांपासून ट्विटच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करताना दिसत आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी कोरोनाची देशातील स्थिती, लसीकरण, औषधं असा विविध मुद्द्यांवरून गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. त्यानंतर आता पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे. बेरोजगारीवरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. केंद्र सरकारच्या “अब की बार मोदी सरकार” या घोषवाक्याची त्यांनी खिल्ली उडवली आहे. तसेच मोदी सरकारच्या काळात बेरोजगारी वाढल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी केला आहे.
कौन ज़िम्मेदार?
सिर्फ़ और सिर्फ़ मोदी सरकार!
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 3, 2021
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. “अबकी बार करोडो बेरोजगार, कोण जबाबदार? फक्त आणि फक्त मोदी सरकार” असं म्हटलं आहे. राहुल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. “अबकी बार करोडो बेरोजगार” हा हॅशटॅग देखील वापरला आहे. सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोरोना समजलाच नाही असं म्हणत याआधी त्यांनी टीकास्त्र सोडलं होतं.
“सरकारला कोरोना संदर्भात अनेकदा सतर्क केलं होतं. मात्र सरकारने आमची चेष्टा केली. सरकारला व पंतप्रधानांना कोरोना समजलाच नाही. कोरोना केवळ एक आजार नाही, कोरोना हा बदलत असलेला आजार आहे. जेवढा वेळ तुम्ही त्याला द्याल, जेवढी जागा तुम्ही त्याला द्याल, हा तेवढाच घातक होत जाईल. मी मागेच म्हटलं होतं, जागा बंद करा. कोरोनाला तुम्ही वेळ देऊ नका, जागा देऊ नका, दरवाजा बंद करा” असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.