सध्या पोलीस कस्टडीमध्ये असलेल्या खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकार आणि मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप लगावले आहे. आपण मागासवर्गीय असल्याने आपल्याला पोलिसांनी पाणी दिलं नाही असा गंभीर आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. तसेचया संबंधी नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांना एक पत्र लिहिलं असून त्यामध्ये हा आरोप केला आहे.
खासदार नवनीत राणा या सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्यांच्या जामीनाच्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. दरम्यान, नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना एक पत्र लिहिलं असून त्यामध्ये म्हटलं आहे की, “आपण मागासवर्गीय असल्याने पोलिसांनी आपल्याला पाणी दिलं नाही. माझ्या जातीवरुन माझा पोलीस ठाण्यात छळ केला गेला. खालच्या जातीची असल्याने मला बाथरुम वापरु दिलं नाही.”
दरम्यान, रविवारी नवनीत राणा यांनी शिवसेनेवर असाच एक आरोप केला होता. मागासवर्गीय महिला आहे म्हणून मला शिवसेनेकडून अपमानस्पद वागणूक दिली जात आहे आणि माझ्याबदल खालच्या दर्जात बोललं जात आहे असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.