आम्हाला तुमचे पैसे नकोत..केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना सुनावले खडेबोल

 

संदप गावाच्या गायकवा़ड कुटुंबातील पाच जणांचा खदानीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी मीडियाला सोबत घेऊन आज केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे पोहोचले. त्यांनी गायकवाड कुटुंबाची भेट घेऊन 50 हजार रुपयांची आर्थिक मदत देणार असल्याचे पत्रकारांसमोर जाहीर केले.

मात्र आम्हाला तुमच्या पैशाची गरज नाही फक्त पाणी द्या, असा टाहो कुटुंबाने फोडला. एवढेच नव्हे तर आठवले यांना खडेबोल सुनावत त्यांना पिटाळून लावले. गायकवाड कुटुंबातील पाच जणांचा खदानीत बुडून मृत्यू झाल्याची घटना 7 मे रोजी घडली होती. या कुटुंबाची विचारपूस करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे आज आले होते.

तसेच आठवले बरोबर आरपीआयचे स्थानिक पदाधिकारीदेखील होते. एकाच कुटुंबातील पाच व्यक्ती दगावल्याने त्यांच्या घरात अजूनही दुःखाचे वातावरण आहे. आठवले यांना गायकवाड कुटुंबाची समजूत काढताना नाकीनऊ आले. गायकवाड कुटुंबाला भेटण्यासाठी आलेले केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी 50 हजार रुपयांची मदत देणार असल्याचे सांगताच या कुटुंबातील एक व्यक्ती संतप्त झाली.

रागाच्या भरात ते म्हणाले, आठवले साहेब ,तुम्ही पैसे काय देताय आम्हीच तुम्हाला देतो… या वक्तव्यामुळे आठवले चपापले आणि सोबत आलेल्या कार्यकर्त्यांसह त्यांनी काढता पाय घेतला

Team Global News Marathi: