आम्हाला गद्दार म्हणू नका असे निरोप पाठवले जातात; आदित्य ठाकरेंनी साधला पुन्हा शिंदे गटावर निशाणा

 

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. रत्नागिरीमध्ये आयोजित सभेमध्ये त्यांनी शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी आदित्य ठाकरेंकडून पन्नास खोके एकदम ओक्केच्या घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे पुन्हा एकदा शिंदे गटाला डिवचण्याचा प्रयत आदित्य ठाकरे यांनी केला होता.

बंडखोर आमदारांकडून गद्दार म्हणू नका असे निरोप पाठवले जातात, पण खोके सरकारला गद्दार नाही तर आणखी काय म्हणायचे असा घणाघात यावेळी आदित्य ठाकरे यांनी केला आहे. राज्यात घाणेरडं राजकारण सुरू आहे. डबल इंजिन सरकार असताना प्रकल्प राज्याबाहेर गेला.

गद्दार सरकारला विकास कामांची माहिती नाही. हे गद्दारांचं घटनाबाह्य सरकार आहे. ते खोक्यासाठी सरकार पाडल्याचं मान्यही करतात असा हल्लाबोलही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला. स्वत:साठी खोके महाराष्ट्रासाठी धोके हेच या सरकारचे सत्य असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

Team Global News Marathi: