२५ वर्ष मुंबईला लुटणारे कुटुंब म्हणजे ठाकरे कुटुंब, त्यांना जेल झालीच पाहिजे

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून राणे कुटुंबीय आणि ठाकरे सरकार यांच्यात वाद होत असल्याचे चित्र दिसून आले होते अशातच आता स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांच्यावर कोट्यवधी रूपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यानंतर आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात यशवंत जाधव यांची डायरी समोर आली असून त्यातून त्यांच्या व्यवहाराची पोलखोल झाली आहे.

या डायरीत ‘मातोश्री’ला 50 लाखांचं घड्याळ दिल्याची नोंद आहे. याबाबत आयकर विभागाने चौकशी केली असता मातोश्री हा उल्लेख म्हणजे आपली आई असल्याचं यशवंत जाधव यांनी सांगितलं. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. निलेश राणेंनी ट्विट करत ठाकरे कुटुंबावर ताशेरे ओढले आहेत.

मातोश्री वाल्यांना पैसे आणि गिफ्ट दिले तरंच पदं मिळतात हे परत एकदा सिद्ध झालं आहे. ठाकरे कुटंब तुरूंगात गेले पाहिजे तेव्हाच कळेल हे सगळे पैसे जमा करून ठेवले आहेत ती गुफा कुठे आहे. 25 वर्ष मुंबईला लुटणारे कुटुंब म्हणजे ठाकरे कुटुंब, त्यांना जेल झालीच पाहिजे, असा घणाघात निलेश राणे यांनी केला आहे.

Team Global News Marathi: