कश्मीर खोऱयात हत्येचे सत्र वाढल्यामुळे कश्मीर पंडितांनी केंद्राला ‘अल्टिमेटम’ दिला आहे. पीएम पॅकेज सपशेल अपयशी ठरले आहे. निरपराधी हिंदूंच्या हत्या थांबवण्यासाठी २४ तासांत ठोस तोडगा काढा, अन्यथा आम्ही सामूहिक स्थलांतर करू, एकाचवेळी सर्वजण खोऱयातून बाहेर पडू, असा इशारा कश्मीर पंडितांनी दिला आहे.
कुलगामच्या शाळेत शिक्षिकेची हत्या झाल्यानंतर कश्मीर पंडितांनी श्रीनगरमध्ये तीव्र निदर्शने सुरू केली. यावेळी हिंदूंच्या सुरक्षेसाठी तातडीने ठोस पावले उचलण्याबाबत केंद्राला इशारा देण्यात आला. धगधगत्या खोऱयातील परिस्थिती जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत कश्मीर पंडितांचे जम्मूतील सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करा, अशी मागणी आंदोलकांनी केली.
कश्मीर पंडितांच्या शिष्टमंडळाने लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात निवेदन दिले. सिन्हा यांनी दोन-तीन वर्षांत कश्मीर ‘दहशतवादमुक्त’ होईल, असा शब्द शिष्टमंडळाला दिला. विशेष पीएम पॅकेजअंतर्गत कश्मीर खोऱयात रोजगार देण्यात आलेल्या चार हजार कर्मचाऱयांपैकी केवळ १२५० लोकांची ट्रान्झिट कॅम्पमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे, उर्वरित चार हजार कर्मचारी भाडय़ाच्या घरात राहत आहेत.