विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या यादीत कुणाचेही नाव वगळण्यात आलेले नाही

सांगली | राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर टीका करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांची विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य नियुक्तीसाठी करण्यात आलेली शिफारस राज्य सरकारने मागे घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. यावर आता जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

राजू शेट्टी प्रकरणी जयंत पाटील म्हणाले, विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या यादीत कुणाचेही नाव वगळण्यात आलेले नाही. आम्ही पुन्हा एकदा राज्य सरकारच्या वतीने राज्यपालांना विनंती केलेली आहे. तीनही पक्षांच्या सहमतीनेचं राज्यपालांना प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यावर राज्यपालांनी लवकर निर्णय घावा अशी अपेक्षा आहे. कारण लोकशाहीचे संकेत पायदळी तुडवले जात आहेत, असे महाराष्ट्रातील जनतेला आता वाटायला लागले आहे. बराच काळ झाला त्याच्यावरचा निर्णय येत नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

एकनाथ खडसे यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईवर पाटील यांनी, ईडी या देशात विरोधी पक्षावर सतत दबाव आणण्याचा प्रयत्न करत असते. कुणाची कोणतीही चूक नसतांना ईडी, सीबीआय या केंद्रीय यंत्रणाचा वापर विरोधी पक्षांना नामोहरम करण्यासाठी केला जातोय. त्यामुळे चूक नसतांना कारवाई करणे आणि बदनामी करणे किंवा प्रभावित करणे सूरु असल्याचे म्हटले.

Team Global News Marathi: