खबर जगाची सकाळच्या सुपरफास्ट हेडलाईन!
वृत्तसंकलन गुरुराज माशाळ
नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना ‘अल कायदा’चा म्होरक्या ओसामा बिन लादेन याचा मुलगा हामजा बिन लादेन ठार झाल्याची माहिती दिली आहे. अफगाणीस्तान -पाकिस्तान सिमारेषेवर झालेल्या गोळीबारीमध्ये हमजा ठार झाल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
नवी दिल्ली : इंडो – युरोपियन काश्मीर फोरमने काल शनिवारी बर्मिंगहॅम मधील व्हिक्टोरिया स्क्वेयर येथे भारत विरोधी प्रचार करणाऱ्यांच्या विरोधात प्रदर्शन केले आहे. यावेळी उपस्थित लोकांनी हातामध्ये तिंरगा घेऊन जम्मू – काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवण्याच्या भारताच्या निर्णयाचे त्यांनी समर्थन केले.
नवी दिल्ली : दिल्लीमधील मंडी हाऊस येथील बाबर रस्त्याच्या फलकाला हिंदू सेनेने काळे फासले आहे. बाबर रस्त्याला एखाद्या भारतीय महान व्यक्तीचे नाव देण्यात यावे, अशी संघटनेची मागणी आहे. आज शनिवारी सकाळी लोकांनी जेव्हा दुकाने उघडली तेव्हा ही घटना उघडकीस आली.
बंगळुरू : ‘दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा’ असं म्हणत देशभर दसरा म्हणजेच विजयादशमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी पी. व्ही. सिंधूला म्हैसूर दसरा उत्सवात उपस्थिती लावण्यासाठी निमंत्रण दिले आहे.
नवी दिल्ली : हिंदी राष्ट्र भाषा व्हावी या वक्तव्यावरून एमआयआमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली आहे. भारत हा हिंदू, हिंदूत्व आणि हिंदीपेक्षा खुप मोठा आहे, असे ते म्हणाले. संविधानातील कलम २९ भारतीय नागरिकाला भाषा, लिपी आणि संस्कृतीचा अधिकार देते’, असा टोला त्यांनी अमित शाह यांना लगावला.
मुंबई : राज्यात वंचित नावाचा एक पक्ष उदयास आलेला असून या पक्षामध्ये धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी होत असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘वंचित’वर टीका केली आहे. राष्ट्रवादीच्या मुख्य कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात पवार यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचे नाव न घेता त्यांच्या धोरणामुळे भाजपला कसा फायदा होतो यासाठीचे सूचक वक्तव्य त्यांनी केले.
मुंबई उदयनराजे भोसले हे भाजपत गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला कोणताही फरक पडणार नाही. त्यामुळे असे राजे गेले तरी सातारा जिल्ह्यातील प्रजा मात्र आमच्या सोबतच आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी काल मुंबईत दिली. नेते जातात येतात त्यामुळे पक्ष काही संपत नसतो असे ते म्हणाले.
मुंबई : प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीकडून खळबळजनक आरोप करण्यात आले आहे. काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यात दिल्लीत बैठक झाली, असा दावा वंचितने केले आहे. शरद पवार यांनी याबाबत खुलासा करावा, अशीही मागणी वंचितकडून करण्यात आली आहे.
मुंबई : युतीचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, पक्षाने आदेश दिल्याने स्वतंत्र लढायची तयारी असल्याचे भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी सांगितले आहे. गृहनिर्माण सोसायट्यांच्या मुद्यावर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदे दरम्यान बोलताना त्यांनी स्वतंत्र लढण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले.
बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला लागलेल्या गळतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडकून टीका केली आहे. बुरे काम का बुरा नतिजा, सून, भाई, चाचा, आ भतीजा, या नितीमुळेच गळती लागल्याची जहरी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. बारामतीत महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी पवार कुटुंबासह राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला.
बारामती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेदरम्यान बारामतीमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा सुरु असताना अजित दादा जिंदाबाद, एकच वादा अजित दादा च्या घोषणा देण्यात आल्या. यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी घोषणाबाजी करणाऱ्या जमावाला पोलिसांनी हुसकावून लावत लाठीचार्चही केला.
औरंगाबाद : मराठवाड्यातील अत्यंत महत्त्वाचं महत्वाचे धरणां पैकी एक असलेल्या जायकवाडी धरण 98 टक्क्यांपेक्षा जास्त भरली आहे. शनिवारी रात्री 8 वाजल्यापासून पैठण जलविद्युत केंद्रातून वीजनिर्मिती करुन एकूण 1589 क्युसेक्सने पाणी सोडण्यात आली आहे. शिवाय डाव्या कालव्यातूनही विसर्ग सुरु आहे. त्यामुळे धरणाखालील भागातील नागरिकांनी सतर्क रहावे असं आवाहन पैठणचे तहसीलदार महेश सावंत यांनी केले आहे.
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठच्या यंदाच्या सोळावा युवा महोत्सव श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठानच्या वडाळा येथील लोकमंगल विज्ञान व उद्योजकता महाविद्यालय येथे होणार आहे. या महोत्सवासाठी महाविद्यालय सज्ज झाले आहे अशी माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस आणि लोकमंगलच्या सचिव अनिता ढोबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.