नवी दिल्ली । विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आठवड्याहून अधिक कालावधी उलटल्यानंतरही राज्यातील सरकार स्थापनेचा तिढा कायम आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राज्यातील निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने चांगले यश मिळवले आहे. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये राज्यातील सत्तास्थापने संदर्भातील भूमिकेबद्दल चर्चा झाली.
शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे –
संजय राऊत यांनी 175 जागांचं गणित कसं केलं हे माहिती नाही, आम्हाला कुणीही प्रस्ताव दिलेला नाही किंवा काही विचारलेलं नाही.
आज महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठीचं संख्याबळ आमच्याकडे नाही. पुढे काय होतं ते पाहावं लागेल.
सोनिया गांधींशी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीविषयी माहिती देण्याचं ठरलं. त्याप्रमाणे आज भेट घेऊन माहिती दिली
आम्ही भाजप-शिवसेनाविरोधात निवडणूक लढवली आहे. जनतेने आम्हाला विरोधात बसण्याचा कौल दिला आहे.