भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे निधन झाले आहे. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर काँग्रेसने ट्वीट करून दु:ख व्यक्त केले आणि कुटुंबीयांचे सांत्वन केले.
या दिवसाची प्रतीक्षा होती!
राजकारणात एक धडाडीचा आवाज लुप्त झाला. लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या असतानाची त्यांची भाषणं जबरदस्त होती.
त्यांचं शेवटचं ट्वीट त्यांच्या जाण्याचे संकेत होते का काय? असं वाटतंय. सुषमा स्वराज सोशल मीडियावर फार सक्रिय होत्या. जम्मू-काश्मीरला कलम 370 च्या जोखाडातून मुक्त करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल तसेच जम्मू-काश्मीरचं विभाजन करणारं विधेयक संसेदत मंजूर करून घेण्याची ऐतिहासिक कामगिरी केल्याबद्दल सुषमा यांनी आज सायंकाळी साडेसात वाजता ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले होते. ‘मैं अपने जीवन में इस दिन को देखने की प्रतीक्षा कर रही थी’ अशा भावनाही सुषमा यांनी या ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केल्या होत्या. या ट्विटनंतर काही तासांतच त्यांची प्राणज्योत मालवली.