सुषमा स्वराज यांच्या विषयी माहित नसणारे पैलू
सुषमा स्वराज यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1952 रोजी झाल्या. त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपद भूषविले. त्यांनी अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये माहिती आणि प्रसारणमंत्री, दूरसंचारमंत्री, आरोग्यमंत्री आणि संसदीय कार्यमंत्री ही मंत्रिपदे सांभाळली. 1998 मध्ये अल्पकाळासाठी त्या दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. डिसेंबर 2009 ते मे 2014 दरम्यान लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याही होत्या. नंतर मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्यांनी परराष्ट्र खात्याची जबाबदारी यशस्वीरीत्या पेलली.
प्रेमविवाह
सुषमा आणि स्वराज कौशल यांची प्रेमकथा त्यांच्या कॉलेजच्या दिवसांत सुरू झाली होती. 13 जुलै 1975 मध्ये त्यांनी लग्न केले. लग्नानंतर सुषमा राजकारणात सक्रिय झाल्या होत्या. सुषमा राजकारणात सक्रिय असल्या तरी त्यांचे पती त्यांच्या कामात कोणतीही दखल देत नव्हते. त्यांनी सुरुवातीलाच एक नियम करून घेतला होता, ‘सहयोग पूर्ण, हस्तक्षेप शून्य’.
सुषमा स्वराजदेखील सांगायच्या की, त्यांच्या राजकीय जीवनात पतीचा हस्तक्षेप नव्हता.
– सुषमा आणि स्वराज कौशल हे पंजाब विद्यापीठाच्या चंदिगडमधील लॉ डिपार्टमेंटमध्ये क्लासमेट होते.
– कॉलेजच्या वक्तृत्व स्पर्धा, डिबेट यामध्ये ते सहभागी होत होते. सुषमा या त्यांच्या टीमकडून हिंदी बोलत होत्या, तर स्वराज हे इंग्रजीत आपले भाषण करत होते.
– त्याकाळात सुषमा स्वराज या ‘जेपीं’च्या आंदोलनात होत्या. जयप्रकाश नारायण यांनी इंदिरा गांधी सरकारविरोधात आवाज बुलंद केलेला होता. त्यांच्या छात्रवाहिनीमध्ये सुषमा स्वराज काम करत होत्या. त्यासोबतच त्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) च्या कार्यकर्त्या होत्या. तर स्वराज हे समाजवादी युग जनसभेचे सदस्य होते.
– दोघांच्या टीमने कधीही स्पर्धेचा पहिला पुरस्कार सोडलेला नव्हता. दोघांचा उद्देश, विचार आणि समज ही एकसारखी होती.
– येथूनच दोघे एकमेकांकडे आकर्षित होत गेले आणि प्रेमात पडले.
– दोघांचे कुटुंब एकमेकांना आधीपासून ओळखत होते, त्यामुळे लग्नात काहीही अडथळा आला नाही.
– सुषमांचे वडील हरदेव शर्मा हे आपल्या मुलीचे स्थळ घेऊन स्वराज कौशल यांच्या आईकडे गेले होते. त्यांनी तत्काळ या लग्नाला होकार दिला.
– दोघांचे वय, प्रोफेशन आणि विचारधारा सर्वकाही जुळत होते, त्यामुळे त्यांच्यातील नाते हे लवकरच पक्के होत गेले.
– सुषमा यांनी त्यांचे आडनाव म्हणून पतीचे नाव ‘स्वराज’ लावण्यास सुरुवात केली ती आजपर्यंत कायम आहे.
– सुषमा आणि स्वराज कौशल यांना एक मुलगी आहे. तिचे नाव बांसुरी आहे. श्रीकृष्ण हे आवडते दैवत असल्यामुळे सुषमा यांनी मुलीचे नाव बांसुरी ठेवले. तीदेखील वकील आहे.