मुंबई । राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचं सरकार स्थापन होणार असं वाटलं असतानाच आज महाराष्ट्राच्या राजकारणाला नाट्यमय कलाटणी मिळाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या अनेपक्षित घडामोडींमुळं राज्यभरात आश्चर्य व्यक्त होत आहे. सत्तास्थापनेच्या नाट्याला कलाटणी, धनंजय मुंडे शरद पवारांकडे परतले. धनंजन मुंडे यांचे वाय बी चव्हाण सेंटरमध्ये आगमन झाले आहे. यावेळईए बोलताना अजित पवारांशी संपर्क साधला नाही. माध्यमातील वृत्त चुकीचे; खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीसाठी दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाले आहेत. आतापर्यत अजित पवारांसोबत असलेल्या आठ आमदारांनी निष्ठा अवघ्या काही तासांमध्ये बदलत पक्षासोबत असल्याची ग्वाही देत स्वगृही परतले आहेत. यामध्ये सर्वाधिक चर्चा आमदार आणि विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे कालपासून नॉट रिचेबल आहेत. मात्र, पक्षाची बैठक सुरु झाल्यानंतर धनंजय मुंडे प्रकट झाले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटामध्ये काहीसा उत्साह दिसून आला.
राष्ट्रवादीतून बंडखोरी करून अजित पवार यांच्यासोबत गेलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते धनंजय मुंडे हे परत राष्ट्रवादीत परतले आहेत. शरद पवार यांच्या नेतृत्वात होत असलेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीला धनंजय मुंडे उपस्थित आहेत. त्यामुळे हा अजित पवार आणि भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. कारण या नेत्यांच्या पाठिंब्यावरच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.