मुंबई । महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेस नेते कपिल सिब्बल यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. शिवसेना सत्तास्थापनेसाठी 3 दिवसांची मुदत मागत आहे. जर तसे झाले नाही तर शिवसेना न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. या विषयावर ठाकरे यांनी सिब्बल यांच्याशी बोललो असल्याचीही माहिती दिली आहे.
राज्यातील सत्ता स्थापनेसाठी बहुमताच्या आकड्यांची जुळवाजुळव सुरू असताना दुसरीकडं राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. केंद्रीयमंत्री मंडळाची बैठक सुरू असून, त्यात राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करण्यात आल्याचे वृत्त आहे. जर राष्ट्रपती राजवट लागल्यास शिवसेना सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याच्या तयारीत होती. राष्ट्रपती राजवटीला आव्हान दिल्यानंतर बाजू मांडण्यासाठी शिवसेनेने काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांच्याशी संपर्क सुरू केला होता. अशातच शिवसेनेची सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली आहे. काँग्रेसचा नेता कपिल सिब्बल सेनेची खिंड लढवणार आहेत.
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi