परंडा । जयवंतराव सावंत प्रतिष्ठान आयोजीत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आज परंडा तालुक्यातील भैरवनाथ शुगर च्या प्रांगनात सोनारी येथे मोठ्या थाटामाटात पार पडला. सावंत प्रतिष्ठान द्वारा आयोजीत विवाह सोहळ्याचे हे 20 वा वर्ष आहे. तर सावंत कुटुंबातील शिवसेना उपनेते माजी मंञी आमदार तानाजीराव सावंत यांचा मुलगा ऋषीराज व पुतन्या ऋतुराज यांचा विवाह देखील या विवाह सोहळ्यातच संपन्न झाला. हंगामी बागायती असलेल्या भुम परंडा विधानसभा मतदार संघामधे सामुदायिक विवाह सोहळा जयवंतराव सावंत प्रतिष्ठान तर्फे आयोजीत करण्याचे हे 20 वे वर्ष आहे.
त्यामुळे हंगामी बागायती असलेल्या तालुक्यातील लोकांना विवाह सोहळ्यामुळे दिलासा मिळत आहे. विवाह सोहळ्यात लग्न लावल्याने सर्वसामान्य कुटुंबातील वर आणी वधु पित्याकडून लग्नासाठी होणाऱ्या खर्चात मोठी बचत होते. आज काल लग्न म्हणजे लाखांचा चुराडाच होतो, कितीही सर्व सामान्य कुटुंब म्हटले तरी लाखाच्या घरात लग्नाचा खर्च जातो त्यामुळे या विवाह सोहळ्यामुळे खर्चास फाटा देता येतो आहे त्यामुळे लोकांना दिलासा मिळत आहे.
आजपर्यंत जवळपास साडे पाच हजार लेकींचे कन्यादान आमदार तानाजीराव सावंत यांनी प्रतिष्ठान मार्फत करण्यात आले आहे. त्यामुळे निश्चितच लोकांना प्रतिष्ठानमुळे मोठा दिलासा मिळत आहे. तर अनेक कुटुंबांना रोजगार उपलब्धी देखील सावंत यांच्या उद्योग समुहामार्फत केली जाते. या विवाह सोहळ्यासाठी उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यातील विविध क्षेञातील दिग्गज मान्यवर व वऱ्हाडी मंडळींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. मराठी कलाकार सिद्धार्थ जाधव, प्राजक्ता गायकवाड, किरण गायकवाड आदी मराठी सिनेकलाकारांची उपस्थिती होती.