श्रीनगर | जम्मू-काश्मीरातील पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये मंगळवारी रात्री उशिरा चकमक झाली. या चकमकीमध्ये सुरक्षादलाला मोठे यश आले आहे. तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षादलाला यश आले आहे. यावेळी बराच वेळ गोळीबार सुरू होता. दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रं होती. त्यांच्याकडून सतत गोळीबार केला जात होता. मात्र भारतीय जवानांना त्यांना सडेतोड उत्तर दिले.
दहशतवादी ज्या भागात लपले होते. तो भाग सुरक्षा दलाने संपूर्ण घेरला होता. यानंतर सुरक्षा दलाने यामध्ये 3 दहशतवाद्यांना गोळ्या झाडल्या. यानंतरही परिसरात शोध मोहीम सुरू आहे. याच परिसरामध्ये आणखी काही अतिरेकी लपून बसले असल्याची शक्यता सुरक्षादलाने वर्तवली आहे.