वंचित आघाडी राज्यात विधानसभा निवडणुक ही स्वतंत्र लढणार -प्रकाश आंबेडकर


सोलापूर : लोकसभा निवडणुकांचा निकाल काय येणार याबाबत देशभरात संभ्रमाचे वातावरण असताना सर्वच राजकीय पक्षांनीआगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीला सुरुवात झाली आहे. सहा महिन्यांवर येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडीने आपली भूमिका स्पष्ट केली असून राज्यात विधानसभा निवडणुक ही स्वतंत्र लढणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे.तसेच वंचित आघाडी च्या जास्त जागा येणार असून राहुल गांधी पेक्षा मायावती ना पाठिंबा देऊ पण शरद पवारांना नाही अशी स्पष्ट भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे.


लोकसभा निवडणुकांसाठी प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्रातील 48 जागा वंचित बहुजन आघाडी लढणार असल्याची घोषणा केली होती. आंबेडकरांचा हा निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात होता. प्रकाश आंबेडकर यांनी असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम या पक्षासोबत वंचित बहुजन आघाडीची स्थापणा केली होती. प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमान या पक्षासह जवळजवळ 100 लहान राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना बहुजन वंचित आघाडी सोबत सहभागी आहेत.

आंबेडकरांनी जे समिकरण लोकसभेसाठी वापरलं तेच समिकरण त्यांनी विधानसभा निवडणुकांसाठी वापरण्याचा प्लान केला आहे. पण असं असलं तरी आता लोकसभा निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी किती बाजी मारते यावरच विधानसभेचा निकाल अवलंबून आहे.

पंतप्रधान पदासाठी राहुल गांधींपेक्षा मायावतींना निवडू पण शरद पवारांना नाही

सोलापूरमध्ये बोलत असताना प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. पंतप्रधान पदासाठी आपण राहुल गांधींपेक्षा मायावतींना निवडू पण शरद पवारांना निवडणार नाही असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

तर यावेळी त्यांनी मोदींवरही निशाणा साधला. मोदींचा तोल सुटला असावा म्हणून त्यांनी राजीव गांधींवर टीका केलं असं आंबेडकर म्हणाले. पंतप्रधान वैयक्तिक टीका करतात म्हणजे त्यांना निवडणूक मोदींच्या हातातून निसटत चालली आहे. अशा शब्दात प्रकाश आंबेडकरांनी मोदींवर निशाणा साधला.

लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत प्रकाश आंबेडकरांनी वर्तवलं भाकीत

भाजप येणार भाजप येणार असा जो धोशा लावला जातोय त्याचा फुगा फुटणार आहे. असं भाकीत प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवलं आहे. वंचित बहुजन आघाडीला किती जागा मिळतील यावर आम्ही मान्यता प्राप्त पार्टी होऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आपण दुष्काळ दौरा करत आहोत मात्र मार्केटिंग करत नाही असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला होता.

सोलापूर की अकोला, दोन्ही जागी जिंकल्यास कोणती सोडणार? आंबेडकर म्हणाले…

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू आणि मायावती या पंतप्रधानपदाच्या दावेदार ठरू शकतात, असं म्हटलं होतं. पवारांच्या या वक्तव्यावर संपूर्ण देशात चर्चा सुरु झाली होती. आता वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा डॉ.प्रकाश आंबेडकर यांनीही पंतप्रधानपदाबाबत मोठं वक्तव्य केलं होतं.


admin: