‘ रिअल इस्टेट क्षेत्र संधी आणि आव्हाने’ या विषयावर मुंबई येथील चर्चासत्र
संत झेवियर्स महाविद्यालय मुंबई, अर्थशास्त्र विभागाच्या डॉ. आदिती सावंत यांचे आयोजन – विविध क्षेत्रातील तज्ञांची उपस्थिती
मुंबई – रिअल इस्टेट, गृहनिर्माण आणि बांधकाम क्षेत्रांना मागील काही वर्षांपासून समस्यांचा सामना करावा लागत आहे त्याची कारणे गांभीर्याने शोधून त्यावर तात्काळ व दूरगामी अनुकूल परीणाम ठरतील अशा काही उपाय योजना करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली गृहनिर्माण विभाग युद्ध पातळीवर काम करीत असून या क्षेत्रातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी ठोस उपाययोजना ठरणारी धोरणे ही सरकारच्या विचाराधीन आहेत. त्याबाबतीत लवकरच निर्णय होणार आहेत ; त्यामुळे या क्षेत्राशी निगडीत असलेल्या व्यावसायिक व नागरिकांनी चिंता करण्याचे फारसे कारण राहणार नाही असे प्रतिपादन महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाचे सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांनी केले.
मुंबई येथील संत झेवियर्स महाविद्यालय येथे जागतिक कीर्तीचे अर्थशास्त्रज्ञ, रिझर्व्ह बँकेचे माजी उपगव्हर्नर व संत झेवियर्स कॉलेज चे माजी विद्यार्थी दिवंगत डॉ सुबीर गोकर्ण यांच्या स्मृती प्रित्यर्थ अर्थशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. अदिती सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली, आयोजीत रियल इस्टेट क्षेत्राचे भवितव्य या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते.
सेंट झेवियर्स कॉलेज हे भारतातील पहिल्या दहा महाविद्यालयांपैकी एक समजले जाते.मुंबई विद्यापीठातील हे अव्वल दर्जाचे मानांकित व नामांकित दर्जाचे महाविद्यालय होते या महाविद्यालयास शासनाने स्वायत्त दर्जा प्रदान केलेला आहे.
रिअल इस्टेट, गृहनिर्माण आणि बांधकाम क्षेत्रांसमोरील आव्हाने ही नोटबंदी जी.एस.टी आदि कारणास्तव नसून जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतीच्या पुनर्विकासासाठी व नवीन इमारती उभारणीमधील न्यायप्रविष्ट प्रलंबीत खटल्यांचा निपटारा होण्यास लागणारा न्यायालयीन विलंब व गुंतवणूकदारांची गुंतवणूक आणि वित्तीय संस्थांची कर्जे यामुळे वाढत गेलेल्या घरांच्या किमती या दुष्टचक्रात विकासक अडकत चालले आहेत यातून मार्ग काढण्यासाठी अनेक उपाय योजना सरकारने केलेया आहेत.
घर खरेदी ही भावनिक बाब असून ते स्वप्न असले तरी सामान्यांना परवडणा-या घराची समस्या ही मोठे आव्हान होती. अति उच्च उत्पन्न गट,उच्च उत्पन्न गट,मध्यम उत्पन्न गट, या वर्गातील घराची मागणी विकासकांनी मोठ्या प्रमाणात पूर्ण केलेली दिसते मात्र अल्प उत्पन्न गट व अति अल्प उत्पन्न गट आर्थिक कमकुवत गट जे प्रामुख्याने बेघर आढळून येतात. या वर्गाकडून अपेक्षीत नफा मिळत नसल्याने या वर्गासाठी गृहनिर्मानासाठी बिल्डर पुढाकार घेण्यास धजावत नाहीत.
ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे.त्यामुळे सहकारी गृह निर्माण संस्थांचा स्वयंपुनर्विकास हा पर्याय पुढे येत आहे. प्रधानमंत्री आवास योजने मधून जे लाभ मिळतात ते घर खरेदी करणे शक्य व्हावे यासाठी सरकार हे अंतिम लाभर्थ्यांना देऊ करते त्याचा लाभ हा विकासकाला त्याच्या नफ्याच्या अपेक्षितपणे मिळावा अशी मानसिकता बिल्डर किंवा विकासकाची असते. तो लाभ विकासकाकडून लाभरट्यांकडे हस्तांतर होत नसल्याने अल्प उत्पन्न गट व अति अल्प उत्पन्न गट व बेघरांसाठीच्या घराच्या वाढल्याने विक्री होत नाही.पर्यायाने प्रकल्प पूर्ण करणेसाठी विकासकावरील म्हणजीच प्रकल्पावरील कर्जाचा व व्याजचा बोजा वाढत जातो.
त्यामुळे परत घरच्या किंमतीत आणखी वाढ होते व परत विक्री घटतर हे दुष्टचक्र थांबविण्यासाठी मर्यादित नफ्यावर विकासकांनी व्यवसाय केल्यास या दुष्ट चक्रातून लाभार्थी व विकासक या दोघांची सुटका होईल.असेही मिरगणे पुढे म्हणाले,
यावेळी गृह कर्जाच्या वित्तीय संस्थांच्या तज्ञ तारा सुब्रमण्यम यांनी वाढत्या किमतीमुळे ग्राहक हे घर खरेदी पेक्षा भाड्याने घेण्यास प्राधान्य देतात हे सुद्धा या क्षेत्रातील मोठी समस्या होत आहे असे मत नोंदवले,अन्न वस्त्र व निवारा ऐवजी भाड्याचे घर या कालखंडातून आपण जात आहोत,मुंबई मध्ये शांघाय व शिकागो पेक्षा मिळणारा एफ एस आय या मध्ये मोठा फरक का आहे, अशा विविध पैलूंवर उपस्थित तज्ञांनी मते नोंदविली विद्यार्थ्यानी विविध प्रश्न उपस्थित केले उपस्थित तज्ञांनी त्यास मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात अर्थशास्त्रज्ञ धर्मकीर्ती जोशी व संत झेवियर कॉलेजचे प्रिन्सिपॉल डॉ राजेंद्र शिंदे यांच्या हस्ते दिवंगत डॉ सुबीर गोकर्ण यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.तर दुसर्या सत्रात कार्यक्रमाच्या उत्तरार्धात, ” रियल इस्टेट क्षेत्राचे भवितव्य ”ह्या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले.
यावेळी एडल्वाइज फायनान्सीयल अॅडव्हायझर्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी राम यादव, जे.एम. फायनान्सीयल होम लोन्स लिमिटेडच्या कार्यकारी संचालक तारा सुब्रमणिम, भारतीय स्टेट बँकेचे वरिष्ठ उपाध्यक्ष मनीष कोठारी , एम.रियल्टीचे संचालक डॉ. अॅड. हर्षूल सावला, अनुवृता रियल्टीचे संचालक राहुल चव्हाण, प्रक्टिसनर्स इंजिनियर्स आर्क्टिटेक्ट्स अँड टाउन प्लनर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष शिरीष सुखात्मे यांनी चर्चासत्रात मार्गदर्शन करून व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
संयोजन व सूत्रसंचालन अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अदिती सावंत यांनी केले.
या विषयावर चर्चा
चर्चासत्रात प्रामुख्याने स्थावर संपदा विंनियमन व विकास कायदा (रेरा) वस्तु व सेवा कर, कमी झालेली ग्राहकांची क्रयशक्ती, बाजारातील मंदी, मुंबईचा नवीन विकास आराखडा, मंजूर होण्यास लागलेला विलंब, बाजारपेठेत होत असलेल्या बदलाबद्दल संशोधनची वाणवा, लघु व मध्यम विकासकाचे आर्थिक प्रश्न, घसरलेले व्याज दर व घरांच्या किंमती, व्यवस्थापनाच्या अभावी निर्माण झालेली मागणी व पुरवठा यामधील अतिरिक्त दरी. बँक व बॅंकेतर संस्था यांमध्ये मध्ये झालेल्या घोटाळ्यामुळे निर्माण झालेले क्लिष्ट प्रश्न अशा विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली.
सदर चर्चासत्रासाठी संत झेवियर्स महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभागाची विद्यार्थी संघटना इको ट्री चे विद्यार्थी जय वांकवाला, भूमिका आहुजा , हरणीत सिंग , इशा शाह,आयुषी शहा , नमिता नायरक्कल, ऐशा शेट्टी व इको सर्कल चे विद्यार्थी प्रमुख रिया देसाई व इतर विद्यार्थ्यांनी यांनी विशेष मेहनत घेतली.
=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.