बार्शी : बार्शी विधानसभा मतदार संघातील निवडणूकीच्या साकत येथे झालेल्या प्रचार सभेत माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाचे सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांच्या पत्नीबद्दल काढलेल्या आक्षेपार्ह, बदनामीकारक वक्तव्यांबद्दल त्यांना अटक करावी. त्यांच्यावर सर्व समाजाने बहिष्कार घालावा अशी मागणी महिला मोर्चाच्या संयोजकांनी केली.
यावेळी प्राचार्य सौ.अश्विनीताई बुडूख, माजी नगराध्यक्षा सौ.मंगलताई शेळवणे, सौ.मंगलताई पाटील, सौ.राणी शेळके, सौ.चिमणाताई शिंदे, सौ.पद्मजा काळे, सौ.प्रतिभा मुळीक, सौ.मनिषा नान्नजकर, सौ.गोकर्णा डिसले, सौ.उज्वला सोपल, सौ. रिजवाना शेख, सौ.अनुराधा पाटील, सौ.निर्मला मिरगणे, कु.पूनम मिरगणे, श्रीमती.उज्वला जाधव, सौ.उज्वला शिंदे, सौ.कांचन गुंड, श्रीमती.सुनंदा जावळे, सौ.सुनिता जाधव, सौ.निता पवार, सौ.मिना पवार, सौ.वर्षा पायघन आदी महिलांनी सामुहिकपणे पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ.सिध्देश्वर भोरे व तहसिलदार प्रदिप शेलार यांना निवेदनाव्दारे केली आहे. यावेळी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम पाटील, शहर पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, माजी मंत्री दिलीप सोपल, महाहौसिगचे सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे, माजी पोलीस अधिकारी भाऊसाहेब आंधळकर, तुकारामबापु शिंदे, शशिकांत पवार, आबाजी पवार, ऍड.प्रकाश गुंड, बिभीषन पाटील, साहेबराव देशमुख, माजी नगराध्यक्ष दगडुनाना मांगडे, शिवाजीराव पवार, शिरीष घळके, दिनेशसिंह परदेशी, राजाभाऊ काकडे, अब्बासभाई शेख, सुशिल पाटील, माजी सभापती युवराज काटे, दिगंबर कानगुडे, सुरज गव्हाणे, संभाजी सोनवणे, अंबादास शिंदे, सुभाष गुंड, बाबा शिंदे, पांडुरंग पाटील, दत्तात्रय शिंदे, भगवान पाटील, ऍड.सुशांत चव्हाण, श्रीधर चव्हाण, शशिकांत गव्हाणे, कुणाल घोलप, पंडीत मिरगणे, ऍड.विकास जाधव, नागजीभाऊ नान्नजकर आदी उपस्थित होते.
सकाळी 11.30 वाजता शहरातील तेलगिरणी चौकात राजमाता जिजाऊ , छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या मुक मोर्चाला सुरूवात झाली. शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या या मोर्चामध्ये हजारों महिला सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या हातामध्ये राऊ त यांना अटक़ करा. महिलांची बदनामी करणार्या प्रवृत्तींचा निषेध असे फलक होते. या मोर्चाचे रूपांतर तहसिल कार्यालयाजवळ जाहीर सभेमध्ये झाले. यावेळी सौ.बुडूख म्हणाल्या राऊतांनी काढलेल्या वक्तव्यांमुळे समस्त स्त्री जातीचा अपमान झाला आहे. यावेळी सौ.काळे म्हणाल्या राजकारणात अशी गलीच्च भाषा वापरणार्यांना निवडणूक आयोगाने कडक शिक्षा दिली पाहिजे.
यावेळी सौ.पाटील म्हणाल्या अशा प्रवृत्ती अतिशय घातक असून अशा व्यक्तिंवर समाजाने बहिष्कार घातला पाहिजे. यावेळी सौ.मुंढे म्हणाल्या महिलांची बदनामी करणार्या समाजकंटकांना छत्रपतींचे नांव वापरण्याचा नैतिक अधिकारच नाही. यावेळी सौ.मुळीक म्हणाल्या महिलांबद्दल अशी विधाने करणार्यांना निवडणूकीत उभे राहण्यास बंदी घातली पाहिजे. यावेळी सोपल म्हणाल्या राऊतांनी काढलेले उद्गार हे त्यांच्या संस्कारहिनता व संस्कृती नसल्याचे लक्षण आहे.