मुंबई । राज्यात सध्या महाविकासआघाडीचे सरकार आहे. तिन्ही पक्षांनी मिळून राज्यात सरकार स्थापन केले असले तरी अजुनही खातेवाटप झालेले नाही. तिन्ही पक्षामध्ये खाते वाटपावरून वाद असल्याच्या बातम्यादेखील समोर येत आहेत. याचसंबंधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शऱद पवार व अन्य महत्वाच्या नेत्यांमध्ये ही बैठक नेहरू सेंटरमध्ये बैठक झाली. या बैठकीत खातेवाटपासंबंधी चर्चा झाली असल्याची माहिती आहे.
हिवाळी अधिवेशानापूर्वी मंत्रीमंडळ विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटपा संदर्भात चर्चा झाली. राज्यात सरकार स्थापन झाले असले तरी अजुनही शपथ घेतलेल्या मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आलेले नाही. येत्या 2 दिवसात खाते वाटप निश्चित केले जाणार असल्याची विश्वसनीय सुत्रांची माहिती आहे.
बैठकीला शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, सुभाष देसाई तर राष्ट्रवादीकडून अजित पवार आणि जयंत पाटील उपस्थित आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांच्यसह जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई छगन भुजबळ व नितीन राऊत या सहा मंत्र्यांचा 28 नोव्हेंबर रोजी शपथविधी झाला.