या दोघांनी माझं राजकारण जाणीवपूर्वक संपवलं, खडसेंकडून पहिल्यांदाच नाव घेत आरोप

मुंबई | माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी माझं तिकीट कापलं असल्याचा खळबळजनक दावा दावा भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसेंनी केला आहे. यापूर्वी एकनाथ खडसे यांनी आपल्या मनातील खदखद अनेक वेळा बोलून दाखवली होती. मात्र त्यांनी फडणवीस आणि महाजन यांने नाव कधीच घेतले नव्हते. आता मात्र पहिल्यंदाच त्यांनी थेट फडणवीस आणि महाजन यांच नाव घेत आरोप केले आहेत. माझं राजकारण संपवण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. यामुळे आता भाजपमधील अंतर्गत वाद उघड झाला आहे.

एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले. कोअर कमिटीमध्ये तिकीट वाटपाबाबत चर्चा झाली होती. त्यामध्ये 17-18 सदस्य होते. यामधील अनेकजण माझ्या ओळखीचे होते. त्यांच्याकडून मला या बैठकीत झालेल्या घटनांची माहिती मला मिळाली. मला विधानसभेची उमेदवारी देण्यासंदर्भात फडणवीस आणि महाजन यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. यानंतर पुढे काय झालं, हे सर्वांनाच माहिती आहे असे खडसे यावेळी म्हणाले

ग्लोबल न्युज नेटवर्क: