अकोले – इतक्या वर्ष शरद पवार साहेबांबरोबर काम केले, त्यांना सोडून जाण्याचे दुःख होत आहे. मात्र पुढील पिढीचे भवितव्य, तालुक्याचा विकास आणि आदिवासी समाजाचे प्रश्न कोण सोडू शकेल हा विचार करूनच भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला अशी भावना राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी चे माजी प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
तालुक्यातील जनता व कार्यकर्त्यांना विचारून हा निर्णय झाला असून त्याला सर्वांचा एकमुखी पाठींबा मिळालेला आहे. त्याच प्रणाने भाजपाच्या अकोले तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आ.वैभव पिचड यांच्या भाजप प्रवेशाचे स्वागत केले आहे. वैयक्तिक निर्णयापेक्षा सामाजिक प्रश्नांची बांधिलकी ला आपण प्राधान्य दिले आहे.
आ.वैभव पिचड हे सोमवार दिनांक 29 जुलै रोजी विधानसभा अध्यक्षांकडे आपल्या आमदारकीचा राजीनामा सुपूर्त करतील.आणि त्यानंतर 30 किंवा 31 जुलैला त्यांचा भाजप पक्ष प्रवेश होईल अशी माहितीही त्यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 17 ऑगस्टच्या महाजनादेश यात्रेच्या स्वागतासाठी तालुक्यातील जनतेने उपस्थित रहावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज
व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा