मोदींच्या लाटेला घाबरून पवारांनी मैदानातून पळ काढला-मुख्यमंत्री

अहमदनगर |  विरोधकांनी मोदी हे स्वप्नातही दिसतात, यामुळे अनेक जण दचकुन उठतात. मोदींच्या लाटेला घाबरून पवार साहेबांनी मॅच सुरू होण्यापुर्वीच मैदानातुन पळ काढला तेव्हांच देशामध्ये व राज्यामध्ये मोदी सरकार परत येणार हे सिध्द झाले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज कर्जत येथे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांच्या प्रचारार्थ सभा झाली यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस वर सडकून टीका केली.

यावेळी पालकमंत्री प्रा राम शिंदे, खासदार दिलीप गांधी, आमदार सुरेश धस, राजेंद्र विखे, बबनराव पाचपुते, सेनेचे जिल्हाप्रमख राजेंद्र दळवी, नामदेव राउत, अंबादास पिसाळ, अशोक खेडकर, जिल्हाअध्यक्ष सुनिल साळवे, हे उपस्थित होते
फडणवीस शरद पवार यांचे नाव न घेता म्हणाले की, हे लबाड आहेत यांचे जेवण जेवल्याशिवाय खरे नाही म्हणून काॅग्रेस व राष्ट्रवादी काॅग्रेसच्या नेत्यांचा ओघ आमच्याकडे आहे. आणि जनतेने यांना घरी बसवले आहे. लोकसभा निवडणूक जाहीर झाली की पवार साहेब राज्याचे कॅपटन म्हणून पॅड बांधून मैदानात उतरले. मात्र, मोदी लाट पाहून ते मॅच न खेळताच आउट झाले आहेत. यावरून जनेतेने ही निवडणूक हाती घेतली आहे आम्ही पाच वर्षामध्ये कर्जमाफी, पिकविमा, कांदा अनूदान, ट्रक्टर व इतर शेती अवजारांवर अनूदान, असे जवळपास 80 हजार कोटी जनतेच्या खात्यामध्ये जमा केले आहेत. अस मत यावेळी फडणवीस यांनी मांडले.

राष्ट्रवादी काॅग्रेस जाहीरमाना पहा यामध्ये पाकिस्तान सोबत आम्ही युध्द करणार नाही असे शरद पवार हे सांगत आहेत. आम्ही म्हणतो नादी लागला तर पाकिस्तानात घूसून मारणार हा फरक आहे, आमच्या व यांच्यामध्ये. यांची भाषणे म्हणजे फक्त मनोरंजन आहे अशी टीका फडणवीस यांनी केली.

admin: