मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दृढ विश्वास, म्हणतात… मी पुन्हा येईन!

नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी… मी पुन्हा येईन! : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई | मी पुन्हा येईन, याच भूमिकेत, नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी… असे सूचक वक्तव्य केले आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

या काव्यपंक्ती उच्चारत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढच्यावेळीही त्यांचेच सरकार येईल असा विश्वास व्यक्त केला. विद्यमान सरकारच्या काळातील शेवटच्या विधिमंडळ अधिवेशनातील शेवटच्या दिवशी ते बोलत होते. महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून परतेल, असा दृढ विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणून काम करताना पाच वर्षांच्या काळात अनेक अडचणी, आव्हाने आली. त्यापासून मी पळालो नाही. सर्वांना सोबत घेऊन, प्रामाणिकपणे आणि सकारात्मकतेने प्रश्न सोडविण्याचे मी प्रयत्न केले आहे.

गेल्या 15-20 वर्षांत न झालेल्या गोष्टी आम्ही करुन दाखवल्या आहेत. महाराष्ट्राचे वैभव परत आणण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहे. आज महाराष्ट्र सर्वच आघाड्यांवर क्रमांक एकचे राज्य आहे. असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

मुख्यमंत्री म्हणाले…

मी पुन्हा येईन! याच निधार्राने,
याच भूमिकेत याच ठिकाणी
नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी
मी पुन्हा येईन!
गावांना जलयुक्त करण्यासाठी
शहरांचा चेहरा बदलण्यासाठी
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी
नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी
मी पुन्हा येईन!
युवा मित्रांना अधिक सक्षम बनविण्यासाठी
बळीराजाला बळकट करण्यासाठी
नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी…
मी पुन्हा येईन!

ग्लोबल न्युज नेटवर्क: