नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षावर भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात शिवसेना-भाजप महायुतीची सत्ता आल्यास देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील,अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मी आणि स्वत: फडणवीस यांनी जाहीर सभांमध्ये केली होती.त्यावेळी यावर कुणीही आक्षेप का घेतला नाही,अशी विचारणा अमित शाह यांनी केली. मुख्यमंत्रीपदाबद्दलची मागणी नव्याने केली जात आहे.मात्र शिवसेनेकसडून केल्या जात असलेल्या मागण्या आम्हाला मान्य नाहीत,असं अमित शाह यांनी स्पष्ट केलं.
उद्धव ठाकरे आणि माझ्यात बंद खोलीत झालेली चर्चा सार्वजनिक करणे योग्य नाही,ती भाजपची संस्कृती नाही.भाजपने शिवसेनेचा कोणताही विश्वासघात केलेला नाही.उलट शिवसेनेने आमची साथ सोडली आहे,असं अमित शाह यांनी म्हटलं. शिवसेनेनं मान्य न होणाऱ्या अटी आमच्यासमोर ठेवल्या आहेत.शिवसेनेची 50-50 ची अट चुकीची आहे. मात्र शिवसेनेसोबत काय फॉर्म्युला ठरला होता,हे मात्र अमित शाह यांनी सांगितलं नाही.मात्र उद्धव ठाकरे यांनी भाजप खोटं बोलतंय असा आरोप केला होता, अमित शहांनी त्यांचा दावा खोडूनही काढला