माजी परराष्ट्रमंत्री,माजी मुख्यमंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. त्यांना दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. स्वराज यांना किडनीचा आजार होता.
मात्र रात्री त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याची माहिती दिली जात आहे. सुषमा यांना हृदयविकाराचा त्रास होऊ लागल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांचे आधीच निधन झाल्याचे स्पष्ट झाले.