पराभवानंतर आढळराव पाटील बोलले, म्हणाले यामुळे झाला माझा पराभव

पुणे | “राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने सर्वात कमकुवत असलेल्या शिरुर मतदार संघात आणि शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात दुर्दैवाने मला अपयश आलं आहे. शिरुर लोकसभा मतदार संघात घड्याळाचं अजिबात कर्तृत्व नाही नसून या मतदार संघात लोकांनी प्रचारात जातीचं राजकारण केलं आणि भावनिक होत संभाजी महाराजांच्या भूमिकेला मतदान केलं. अस पराभवच विश्लेषण करत थेट राष्ट्रवादी काँग्रेसवर माजी खासदार शिवाजी आढळराव यांनी निशाणा साधला आहे.

शिरुर लोकसभा मतदार संघात माझ्या पराभवामुळे मला वाईट वाटलं नाही तर चौथ्यांदा निवडून आलो असतो तर शिवसेनेला महत्वाचं मंत्रिपद मिळालं असतं. हे मंत्रिपद गेल्यानं तालुक्यातील जनतेला दुःख झालं आहे. अस स्पष्टीकरणही यावेळी आढळराव यांनी दिल. माझ्या पराभवाचा वचपा आंबेगावची जनता नक्की भरून काढेल. अस सांगत थेट राजकीय विरोधक दिलीप वळसे पाटील यांच्यावर निशाणा साधला. अस सांगत यापुढेही जनता दरबार भरला जाईल अशी स्पष्टोक्ती आढळराव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

विधानसभा निवडणुकीत मी उभा राहणार नाही तर जनता ठरवेल तो उमेदवार इथून दिला जाईल. पण आपल्या दादाला ज्याने पाडलं त्याचा आंबेगावची जनता समाचार घेइल अस सांगत दिलीप वळसे पाटील यांच्यावर निशाणा साधला. राज्यसभा हा माझा विषय नाही मी लढणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे संधी मिळाली तरी राज्यसभेवर जाणार नाही असं सांगत या चर्चेलाही आढळराव यांनी पूर्णविराम दिला.

पराभवानंतरही आज रविवारी शिवाजीराव आढळराव यांचा मागील 15 वर्षात नियमित भरणारा जनता दरबार आजही नेहमीप्रमाने रविवारीच भरला. यावेळी अनेकांनी शिरुर खासदार आढळराव यांची भेट घेतली आणि सांत्वन केलं. यावेळी पत्रकार परिषदेत आढळराव यांनी आपला पराभव मान्य करत राष्ट्रवादी काँग्रेस वर निशाणा साधला.

admin: