औरंगाबाद | औरंगाबादमधील युतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांची सह्याद्री बंगल्यावर भेट घेऊन भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची तक्रार 3 मे रोजी केली होती. दानवे यांनी युतीचा धर्म न पाळता जावई धर्म पाळला असल्याचे सांगत खैरे यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. याला उत्तर देताना दानवे म्हणतात की, – औरंगाबादमध्ये खैरे पडल्याचं जितकं वाइट वाटलं तेवढं हर्षवर्धन पडल्याचं नाही नातं आणि राजकारण आम्ही वेगळ ठेवतो. अस म्हणत दानवेंनी खैरेंची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच विधानसभेला देखील राज्यात भाजप-शिवसेनेचा 50-50 % हाच फॉर्मूला असणार आहे. अस देखील मत राबसाहेब दानवेंनी मांडले आहे.