जालना । वीज कोसळून तीन जणांचा जागीच मृत्यू तर दोन जण जखमी झाल्याची घटना जालना जिल्ह्यात घडलीये. गयाबाई गजानन नाईकनवरे, संदीप शंकर पवार आणि मंगल नागोराव चापले अशी मृत्यू झालेल्यांची नावं आहेत तर सुमन साहेबराव नाईकनवरे आणि एक आठ वर्षांचा लहान मुलगा जखमी झाला आहे.
सावरगाव भागडे या गावातील शिवारात काही शेतकरी शेतात सोयाबीन काढणीचं काम करत होते. दुपारी अचानक पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे पावसापासून बचावाकरिता काही जण झाडाखाली थांबले. मात्र त्याच दरम्यान त्या झाडावर वीज कोसळली.
त्यामुळे तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एक लहान मुलगा जखमी झाला. मृतांमध्ये दोन महिला तर एका पुरुषाचा समावेश असून जखमींना उपचाराकरिता रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे.
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi