मुंबई । मेट्रो कारशेडसाठी करण्यात येत असलेल्या वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या नागरीकांना पोलीसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते.
न्यायालयाने या त्यांना न्यायलयीन कोठडी सुनावली होती. या सर्व 29 जणांना न्यायालयाने जामिन मंजूर केला आहे. या सर्वांना बोरिवलीच्या न्यायालयात हजर केले होते.
दरम्यान, वृक्षतोडीचे पडसाद शनिवारी महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये उमटले. यावेळी भाजप सोडून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी या वृक्षतोडीचा तीव्र निषेध नोंदवला. मेट्रो कारशेड आणि आरेतील वृक्षतोड रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी घेतला आहे.
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi