खबर जगाची सकाळच्या सुपरफास्ट हेडलाईन
वृत्तसंकलन: गुरुराज माशाळ
जम्मू-काश्मीर : भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी बुधवारी श्रीनगर येथे माध्यमांशी संवाद साधला,यावेळी त्यांनी जम्मू-काश्मीरमधील स्थानिक राजकीय नेते आपल्या स्वार्थासाठी या ठिकाणी भीतीचे वातावरण तयार करत असल्याचा आरोप केला.
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची संख्या वाढवण्यात येणार आहे. बुधवारी केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. न्यायमूर्तींची संख्या वाढविण्यासाठी संसदेत विधेयक आणण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.
नवी दिल्ली : आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या प्रगती बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वर्ष २०२२ पर्यंत सर्वांना घर देण्याचा संकल्पाचा पुनरूच्चार केला, याबरोबरच पंतप्रधान मोदींनी सर्व राज्यांना पाणी बचतीसाठी अधिक प्रयत्न करण्याचे निर्देश दिले.
नवी दिल्ली : काल राज्यसभेत बहुचर्चित मोटर वाहन दुरुस्ती विधेयक २०१९ १३ विरूद्ध १०८ अशा फरकाने मंजूर झाला. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी काल राज्यसभेत हे विधेयक मांडला, वाहतुकीचे नियम मोडल्यास दहापट दंड आकारण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडिताने लिहिलेले पत्र न मिळाल्याने सरन्यायाधीश रंजन गोगोई उद्विग्न; रजिस्टार यांच्याकडून या प्रकरणी अहवाल मागवला. १२ जुलै रोजी लिहिलेले पत्र अजुनही माझ्यासमोर का सादर केले नाही? असा उद्विग्न सवाल त्यांनी विचारला.
नवी दिल्ली : पाकिस्तानी सैनिकांकडून निर्दोष नागरिकांची केली जाणारी हत्या थांबावावी यासाठी परराष्ट्र मंत्रालयाकडून पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना खरमरीत पत्र पाठवण्यात आले आहे. या पत्रात म्हटले आहे की, भारत सरकार पाकिस्तानी सैनिकांकडून केल्या जाणाऱ्या निर्दोष नागरिकांच्या हत्यांचा तीव्र निषेध व्यक्त करत आहे.
उत्तरप्रदेश : उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोयडा येथील ‘पाकिस्तानवाली गली’ या वसाहतीच्या रहिवाशांनी वसाहतीचं नाव बदलण्याची विनंतीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडे केली आहे. वसाहतीच्या नावामुळे शासनाने पुरविलेल्या मुलभूत सुविधांचाही लाभ घेता येत नाही असं येथील नागरीकांचं म्हणणं आहे.
मुंबई : पक्षांतरावरुन काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘कार्यकर्ते हेच काँग्रेस पक्षाचे खरे बळ आहे. त्यामुळे जे गेले त्यांना जाऊ द्या. रिक्त झालेल्या जागांवर नवीन लोकांना संधी दिली जाईल. त्यातूनच निश्चितच तरूण, नवीन रक्ताला वाव मिळेल.’ असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल मुंबईत काँग्रेस पक्षाकडून इच्छुक उमेदवारांची मुलाखती घेण्यात आली, या मुलखातीकडे काँग्रेसचे अनेक आमदारांनी पाठ फिरवली, या मध्ये असलम शेख, कृपाशंकर सिंग, वर्षा गायकवाड, अमिन पटेल यांचा समावेश यांचा समावेश होता.
मुंबई: हवाईदलाच्या मोबाइल वॉर गेमचे हवाईदल प्रमुख बी.एस. धनोआ यांच्या हस्ते लाँचिंग करणायत आले.
बंगळुरू : कॅफे कॉफी डे चे मालक व्ही. जी. सिद्धार्थ यांंनी आत्महत्या केल्यानंतर कॅफे कॉफी डे एंटरप्रायझेसच्या अंतरिम अध्यक्षपदी एस. व्ही. रंगनाथ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर नितिन बागमाने यांना कंपनीचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर करण्यात आले आहे.
गोवा : आंध्र प्रदेशच्या पावलावर पाऊल ठेवत गोव्यातील भाजप सरकारनेही खासगी नोकऱ्यांमध्ये भूमिपुत्रांना ८० टक्के आरक्षण देण्याचे निश्चित केले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल विधानसभेत याबाबत माहिती दिली.
गोवा : दोन महिन्यांची मासेमारी बंदी बुधवारी मध्यरात्री संपुष्टात आल्यानंतर आजपासून मच्छीमारी ट्रॉलर्स राज्यातील विविध जेटींवरून समुद्रात मासेमारीसाठी रवाना होणार आहेत. त्यामुळे लवकरच गोवा वासीयांना ताजी मासळी मिळणार आहे.
बेळगाव : सैन्यदलाच्या महिला पोलीस भरतीला उस्फूर्त प्रतिसाद, बेळगाव येथे १ ते ५ ऑगस्ट दरम्यान मराठा लाईट इन्फन्ट्रीच्या शिवाजी स्टेडियमवर भरतीची प्रक्रिया होणार आहे, अशी माहिती ब्रिगेडियर दिपेंद्र रावत यांनी पत्रकारांना दिली.
पुणे: महिला सबलीकरणाविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार शरद पवारांनी गमावला; खासदार संजय काकडे यांची टीका.
पुणे: उन्नावचा भाजपा आमदार कुलदीप सेंगरवर बलात्काराचा आरोप करणाऱ्या पीडितेच्या कारला झालेल्या संशयास्पद अपघाताच्या निषेधार्थ ‘अभिव्यक्ती’ संघटनेकडून मेणबत्त्या निषेध व्यक्त करण्यात आला.
शिर्डी : शिर्डीत राज्यातील 47 हजार सरपंच आणि उपसरपंचाची परिषदेचे आयोजन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी लावली हजेरी. राज्याच्या विकासाबाबत या परिषदेत मंथन करण्यात आलं.
सोलापूर : शेतक-यांच्या पीक विम्याचा प्रश्न राज्यात दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे, या गंभीर बाबींकडे शासन मात्र दुर्लक्ष करत असल्याने काल प्रहार शेतकरी संघटनेकडून जेलभरो आंदोलन आंदोलन करण्यात आले.
वैराग : शेतीचे उत्पादन वाढले पाहिजे, तरुणांच्या हाताला काम मिळाले पाहिजे, यासाठी बाजार समितीच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना प्रक्रिया उद्योग करण्यासाठी हवे ते सहकार्य करू असे मत माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी व्यक्त केले.