मुंबई । शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीने मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये आपल्या सर्व आमदारांना आणत शक्तीप्रदर्शन केलं. यावेळी तिन्ही पक्षांचे आमदार हॉटेलमध्ये उपस्थित होते. महाविकासआघाडीच्या शक्तीप्रदर्शनात 162 नाही तर फक्त 130 आमदार होते असा दावा भाजप नेते नारायण राणे यांनी केला आहे. आघाडीच्या शक्तीप्रदर्शात 162 नव्हे तर फक्त 130 आमदार होते. त्यात काही विधानसभेतील आमदारांचा भरणा होता, अशी टीका नारायण राणे यांनी केली.
शपथ घेतली त्यात काय झालं? शपथ घेतल्याने काय होणार आहे? मातोश्रीवर रोज शपथ घेतली जाते त्याचा काय उपयोग? जे आमदार उपस्थित होते त्यांच्यापैकीही किती प्रामाणिक आहेत? हा प्रश्न माझ्या मनात आहे” असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे. हयातमध्ये 130 आमदार उपस्थित होते असा दावा नारायण राणेंनी केला आहे.
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या एकूण 162 आमदारांचे एकत्र फोटो सेशन आणि ओळख परेडचा कार्यक्रमावर त्यांनी ही टीका केली. महाविकासआघाडीच्या या कार्यक्रमादरम्यान काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून एकजूट दाखवण्यात आली. यावेळी जमलेल्या सर्व आमदारांना एकनिष्ठेतेची शपथ दिली गेली.