कृषी, रोजगार व अर्थव्यवस्थेची वाट लावणारे राज्य बदलण्याचा जयंत पाटलांचा निर्धार,प्रदेशाध्यक्ष कारकिर्दीला एक वर्ष पूर्ण

मुंबई:ग्लोबल न्यूज नेटवर्क

पुढील सहा महिने आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्वाचे आहेत. जनतेच्या विरोधात काम करून राज्याच्या कृषी, रोजगार आणि अर्थव्यवस्थेची वाट लावणारे राज्य सरकार या राज्यातील जनतेच्या साथीने आपल्याला बदलायचे आहे आणि शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात आपल्याला रयतेचं राज्य आणायचं आहे असा संदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.कृषी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी पाटील यांची निवड होऊन आज एक वर्ष पूर्ण झालं. त्यानिमित्ताने त्यानी सोशल मीडियावर एक पोस्ट प्रसिद्ध केली असून त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की ,पक्षातील माझे सर्व सहकारी, पदाधिकारी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने मी हि जबाबदारी पार पाडू शकलो.

गेल्या वर्षभरात आपल्या पक्षाचा पूर्ण फोकस बूथ पातळीवरील पक्षबांधणी आणि सध्याच्या केंद्र व राज्यातील जनविरोधी सरकारचा पर्दाफाश करणे हा राहिलेला आहे. प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्या मिळाल्या मी लगेचच पक्षाच्या सर्व विधानसभा मतदारसंघातील निरीक्षकांच्या बैठकी घेऊन प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील आपल्या पक्षाची स्थिती जाणून घेतली. पक्षाच्या राज्य कार्यकरिणीतीही समाजाच्या सर्व स्तरांतील व घटकांतील सहकाऱ्यांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.

आत्ताच्या क्षणाला आपल्या पक्षाचे बूथ पातळीवरील राज्यभर एकूण चार लाखांपेक्षा अधिक सदस्य झालेले आहेत. बूथ पातळीवर सर्व अध्यक्षांशी मी वेळोवेळी ऑडियो कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मी संपर्कात आहे.

हल्लाबोल, निर्धार परिवर्तनाचा सारख्या राज्यभरात झालेल्या आंदोलनातून जनतेच्या आक्रोशाला वाट मिळाली, पक्षाच्या सर्व स्तरांतील कार्यकर्त्यांना एक चांगला कृतिकार्यक्रम मिळाला.
छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील नवा महाराष्ट्र घडवण्याची जबाबदारी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे आणि आपल्या मित्रपक्षांना सोबत घेऊन आपण ती पार पाडूयात.

गेल्या वर्षभराच्या काळात मला साथ देणाऱ्या आपल्या पक्षाच्या सर्व नेत्यांचे आणि मला भरभरून प्रेम देणाऱ्या सर्व पक्षकार्यकर्त्यांचे मनापासून आभार !

NCP

admin: