खबर जगाची सकाळच्या सुपरफास्ट हेडलाईन
वृत्तसंकलन : गुरूराज माशाळ
नवी दिल्ली : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीच्या ताब्यात असणारे डी. के. शिवकुमार यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला असून, त्यांना १७ सप्टेंबरपर्यंत ईडीच्या ताब्यात ठेवण्याचे आदेश दिल्ली न्यायालयाने दिले आहेत. ईडीचे प्रातिनिधित्व करणारे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल के. एम. नटराज यांनी, शिवकुमार हे चौकशीस सहाय्य करत नसल्याचे सांगितले होते. शिवकुमार यांच्यासह इतर काही लोकांची चौकशी आणि बँकेच्या कागदपत्रांची माहिती मिळवण्यासाठी अधिक वेळाची मागणी ईडीने केली होती.
नवी दिल्ली : समाज माध्यमाच्या प्रोफाईलला आधार कार्ड जोडण्याचा प्रश्न लवकर सोडविण्याची गरज सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली. फेसबुकच्या वतीने मद्रास, मुंबई आणि मध्यप्रदेशच्या उच्च न्यायालयातील प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्याची याचिका दाखल केली आहे. त्याबाबत केवळ विचार करणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
नवी दिल्ली : देशातील कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने निर्यातीवर काहीअंशी निर्बंध घातले आहेत. सरकारने निर्यातीसाठी प्रतिटन ८५० डॉलर एवढी किमान आधारभूत किंमत निश्चित केली आहे. त्यामुळे या आधारभूत किमतीहून कमी दराने कांदा निर्यात करता येणार नाही.
नवी दिल्ली: दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विजय मिळवला आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव या पदावर एबीव्हीपीने यश मिळविले आहे. काँग्रेस संलग्न विद्यार्थी संघटना यांनी एनएसयूआय केवळ सचिव पदावर विजय मिळविला आहे. मागील वर्षी ही एबीव्हीपी ने तीन जागा जिंकल्या तर यांनी एनएसयुआय ने एक जागा जिंकली होती. एबीव्हीपीच्या अक्षित दहिया यांनी अध्यक्षपदासाठी 19000 मतांनी विजय मिळविला. उपाध्यक्षपदी प्रदीप तवर हे 8573 मतांनी विजयी झाले आहेत सचिव पदावर शिवानी खारवाल तीन हजार मतांनी विजयी झाली.
नवी दिल्ली : काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी- वढेरा यांचे पती आणि उद्योगपती रॉबर्ट वडेरा यांना परदेश दौऱ्यासाठी दिल्लीच्या विशेष न्यायालयाकडून परवानगी मिळाली आहे. कोर्टाने त्यांना 21 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान स्पेनला जाण्याची परवानगी दिली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्यांना आधीच जामीन मिळाला आहे. विशेष म्हणजे रॉबर्ट वडेरा यांनी व्यवसायाच्या उद्देशाने प्रदेशात जाण्याचा परवानगीसाठी अर्ज केला होता.
मुंबई : संविधानाच्या मूळ प्रतीत राम, कृष्ण आणि भगवद गीतेचा उल्लेख असून, संविधान निर्मात्यांना यातूनच प्रेरणा मिळाली असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी केले आहे. ‘मोदी सरकारच्या काळातील कायद्याच्या सुधारणा’ या विषयावर मुंबई विद्यापीठाच्या सभागृहात ते बोलत होते. आपल्या भाषणात रविशंकर प्रसाद यांनी संविधानाची मूळ प्रत आपल्याकडे असल्याचा दावाही केली आहे.
मुंबई : समांतर आरक्षणाच्या मुद्द्यावर नंतर निवड रद्द झालेल्या सहायक मोटार वाहन निरिक्षक (गट क) पदावरील 118 उमेदवारांना परिवहन विभागाने मोठा दिलासा दिला आहे. या उमेदवारांना अतिरिक्त पदावर नियुक्ती देण्याचा ऐतिहासीक निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली.
मुंबई : लोकसभा निवडणुकीत आम्ही कोणतीही अट न घालता महायुतीला पाठिंबा दिला आणि सर्व प्रकारचे सहकार्य केले. आता विधानसभेच्या आम्हाला १२ जागा हव्या आहेत. यासाठीची मागणी आपण महायुतीकडे केली असल्याची माहिती रयत क्रांती संघटनेचे प्रमुख व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी माध्यमाशी बोलताना दिली.
मुंबई : राज्य सरकारने दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने ऊसतोड कामगार महामंडळाच्या स्थापनेचा आदेश निर्गमित केला आहे. या महामंडळाच्या अध्यक्षपदी माजी आमदार केशवराव आंधळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून वाट पाहणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या महामंडळाची स्थापन करण्यात आली आहे. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी यासाठी पाठपुरावा केला आहे.
मुंबई: राज्य सरकारच्या अधिपत्याखालील मेटल्स अँड मिनरल्स ट्रेडिंग कॉर्पोरेशन पाकिस्तानी कांद्याचा आयातीसाठी निवेदन काढली आहे. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या राज्य सरकारला पाकिस्तानी शेतकर्याबद्दल प्रेम का उकळून आले आहे असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. इतर वेळी पाकिस्तानला शिव्या घालायचे आणि दुसरीकडे पाकिस्तानचा कांदा आयात करायचा भाजपच्या दुतोंडीपणा आहे कांद्याचे भाव वाढले तर शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे मिळतील परंतु भाजपला शेतकऱ्यांचे चिंता नाही हे सरकार शेतकरी विरोधी असून भाजपला फक्त व्यापाऱ्यांची चिंता जास्त आहे असे बाळासाहेब थोरात म्हणाले.
पुणे : मेगाभरती सुरु होण्याआधिपासुनच बारामतीला लक्ष्य केले असुन ज्यांना पक्षांतर करायचंय त्यांच्यासाठी भाजपाचे दरवाजे नेहमीच उघडे आहेत. आधीच्या पक्षात जे कंटाळलेले आहेत. आधीच्या पक्ष नेतृत्वावर ज्यांचा विश्वास राहिला नाही ते लोक सध्या भाजपात येत असल्याचे वक्तव्य पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी केले आहे.
पुणे : राज्यात दारूबंदी करत नसल्याने मुख्यमंत्र्यांना महाजनादेश यात्रेत दारूच्या बाटल्यांचा हार घालण्याचा इशारा भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी दिला आहे. महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्यात येत आहेत. पुण्यातल्या हडपसर येथे सायंकाळी मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा दाखल होणार असून शहराच्या विविध भागात ही महाजनादेश यात्रा जाणार आहे.
सोलापूर : शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर भारतीय राज्यघटनेनुसार सर्वधर्म समभावाचा विचार बिंबवून तो विचार पुढे न्यावा असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलं. डॉक्टर फडकुले सभागृहात काल गांधी फोरमच्या वतीने राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कारांचे वितरण त्यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे होते. यावेळी 15 शिक्षक आणि विविध शाळांना आदर्श पुरस्काराने सन्मानित करण्यात आला. कार्यक्रमासाठी सातलींग शटगार, पुरुषोत्तम बलदवा, मोहन वैद्य, उमाकांत चनशेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते.
सोलापूर : आपल्या शालेय जीवनातील वाणीच्या संस्कारातून व्यक्तिमत्व तयार होतं असं प्रतिपादन सोलापूर आकाशवाणीचे सहाय्यक संचालक सुनील शेळके यांनी केला. आकाशवाणी आणि संगमेश्वर पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मयोगी आप्पासाहेब काडादी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित निबंध, वक्तृत्व आणि चित्रकला स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे सचिव धर्मराज काडादी, शीतल काडादी, शरणराज काडादी, कार्यक्रमाधिकारी रमेश गोखले, निवेदक अभिराम सराफ, प्राचार्य गायत्री कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना ते शिंनखेडे म्हणाले की बदलत्या तंत्रज्ञानाचा उपयोग मुलांनी आपल्या शालेय जीवनात करून घेतला पाहिजे आकाशवाणी विविध गटातील श्रोत्यांसाठी वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती नेहमी करते त्याचा लाभ घ्यावा असे ते म्हणाले. यावेळी निवेदक अभिराम सराफ उच्चार शुद्धते विषयी मार्गदर्शन केलं. अध्यक्षीय भाषणात काडादी यांनी कर्मयोगी आप्पासाहेब काडादी यांच्या आठवणींना उजाळा देत स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केलं. या स्पर्धेत एकूण 321 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष पवार यांनी केल.
सोलापूर : सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदावर पात्र 125 मराठा मुलं व मुली यांच्यावर अन्याय झालेला आहे. MPSC च्या माध्यमातून पूर्ण प्रक्रियेत पास झालेली हे बांधव सरकारच्या अनागोंदी कारभारामुळे नियुक्तीला मुकत आहेत. या झालेल्या अन्यायाविरोधात काल सकल मराठा समाज सोलापूर जिल्ह्याच्या वतीने 125 मराठा मुली व मुलांच्या अन्यायाविरोधात जिल्हा परिषद पुनम गेट समोर हलगीनाद आंदोलन करण्यात आले. तसेच सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी माऊली पवार विनोद भोसले गणेश डोंगरे व मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोलापूर : मानधनात वाढ मिळावी यासह विविध मागण्यासाठी आशा गटप्रवर्तक यांचे अशा प्रवर्तकांनी मानधनात वाढ मिळावी यासह विविध मागण्यांसाठी राज्य अशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीने 3 सप्टेंबर पासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. हे उपोषण आज सलग बारावी दिवशीही सुरू आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा समोर आशा वर्गाचे हे आंदोलन सुरू आहे.
पंढरपूर: गणेश विसर्जनासाठी चंद्रभागा नदीवर गेलेल्या दोन युवकांनी नदीत उड्या मारल्या. यापैकी एकास वाचवण्यात यश आले. मात्र दुर्दैवाने एक जण वाहून गेला आहे ही दुर्घटना गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जुना दगडी पूल येथे घडली. जयवंत बापू मोरे वय 21 राहणार असे वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे.