करमाळा: रश्मी बागल यांना उमेदवारी दिली तर मि गप्प बसणार नाही, व मला दिली तर रश्मी बागल गप्प बसणार नाहीत हि वस्तुथिती -आमदार नारयण पाटील
करमाळा: रश्मी बागल यांना उमेदवारी दिली तर मी गप्प बसणार नाही, व मला दिली तर रश्मी बागल गप्प बसणार नाहीत हि वस्तुस्थिती आहे असे रोखठोक प्रतिपादन आमदार नारायण पाटिल यांनी सोलापुर येथे जिल्हा समन्वयक शिवाजीराव सावंत यांच्या उपस्थितित झालेल्या “निर्धार मेळाव्यात”बोलताना व्यक्त केले.
या वेळी अधिक बोलताना आ. नारायण पाटील म्हणाले की स्टेज वर एक बोलायचं व करायचं दुसरं या पेक्षा मी स्पष्ट सांगतो कि आमच्या दोघा पैकी एकाला उमेदवारी मिळाली तर दोघे एकत्र काम करणे अशक्य आहे त्यामुळे शिवाजीराव सावंत किंवा मंत्री तानाजीराव सावंत यांनी करमाळ्यातुन विधानसभा लढवावी आम्ही दोघं खांद्याला खांदा लावुन काम करु आशी ग्वाही दिली
आमदार पाटील यांनी आपल्या भाषणातुन केलेल्या या मागणी मुळे "एक म्यान मे दो तलवार नही रह सकती"असे स्पष्ट केले असुन उमेदवारी न मिळाल्यास वेगळा विचार करण्याचा इशाराच आमदार पाटील यांनी दिला असल्याची चर्चा शिवसैनिकांत रंगली होती.
उमेदवारीचा आदेश उद्धव ठाकरे यांचाच -शिवाजीराव सावंत
आमदार नारायण पाटील यांच्या करमाळ्यातुन सावंत बंधुनी विधान सभा लढवावी या भाषणाचा धागा पकडुन जिल्हा समन्वयक शिवाजीराव सावंत म्हणाले की आबांनी सुचवलेला मार्ग मस्त आहे पंरतु आबा शिवसेनेत फक्त उद्धव ठाकरे यांचाच आदेश चालतो, करमाळ्याची उमेदवारी कोणाला हे अजुन ठरले नाही पक्षप्रमुख देतील तो आदेश मान्य करण्याची तयारी ठेवा असे सुनावले.
=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.