मुंबई |राज्यातील सत्तासंघर्षाला आता पुर्णविराम मिळाला आहे. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत सर्वांनाच धक्का दिला आहे. या अचानक झालेल्या सत्ता पालटाने सर्वच आश्चर्यचकीत झाले आहेत. आता शपथविधीदरम्यान अजित पवार आणि पार्थ पवार या ठिकाणी उपस्थित होते. आता अजित पवारांनी बंड पुकारला आहे की, ही शरद पवारांची खेळी होती असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे.
आता या शपथविधी सोहळ्यावर शरद पवार काय उत्तर देणार हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. तर काँग्रेसलाही हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस आणि शिवसेनेला न जुमानता भाजपचा हात धरला आहे. राज्यातील राजकारणातील खेळ अचानक उलटल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता यावर शरद पवार काय उत्तर देणार हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही शुक्रवारी उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री असणार अशी माहिती दिली होती. मात्र सकाळी हे वृत्त आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.