उजनी व वीरमधून ४५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमा दुथडी भरून वाहणार

पार्थ आराध्ये

पंढरपूर- उजनी व वीरमधून मिळून ४५ हजार क्युसेक पाणी सोडले जात असल्याने भीमा नदी पुन्हा दुथडी भरू वाहण्यास सुरूवात होईल.

दौंडजवळून उजनी धरणात मिसळणारी आवक 12 वाजता १८ हजार क्युसेकच्या पुढे गेल्याने  धरणातून भीमा नदीत 20 हजार क्युसेकचा विसर्ग केला जात आहे. पुणे बंडगार्डनचा विसर्ग २० हजार क्युसेक आहे. मुळशी, चासकमान, भामा, आंध्रा, घोड या धरणातून पाणी सोडले जात आहे.

उजनी धरण क्षमतेने भरले असून यात पाणी साठवण करण्यासाठी जागा नसल्याने येणारी आवक पुढे सोडण्याशिवाय पर्याय नाही. धरणातून कालवा, सीना माढा योजना, बोगदा, दहिगाव योजनेत पाणी सोडले जात आहे. याच बरोबर वीज निर्मितीसाठी देखील 1600 क्युसेकने पाणी सोडले जात असल्याने भीमा नदीत एकूण विसर्ग 21 हजार 600 क्युसेकचा इतका आहे.

धरण परिसरात पावसाचा जोर असून मागील चोवीस तासात 17 मिलीमीटर पर्जन्याची नोंद आहे. या प्रकल्पावर या पावसाळ्यात एकूण 240 मि.मी. पाऊस नोंदला गेला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुणे परिसरात पावसाचा जोर वाढल्याने उजनीत येणार्‍या पाण्यात वाढ होत असल्याने सकाळी दहा हजार क्युसेकने पाणी सोडले जात होते तो विसर्ग नंतर वाढवून 20 हजार करण्यात आला. मागील चोवीस तासात पुणे परिसरात मुसळधार पाऊस झाला आहे.

दरम्यान नीरा खोर्यात होत असलेल्या पावसाने वीर धरणातून नीरा नदीत ,२३ हजार क्युसेक पाणी विसर्ग आहे. हे पाणी संगमजवळून भीमेत मिसळते. उजनी व वीरच्या पाण्याने भीमा दुथडी भरून वाहण्यास सुरुवात होईल. भीमेवरील बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.

ग्लोबल न्युज नेटवर्क: