उदयन राजेंचे भाजपात जाणे दुर्दैवी आहे असं महाराष्ट्रातील प्रत्येकजण बोलत आहे. त्यांनी भाजप प्रवेशाच्या पोस्ट वर महाराष्ट्रातील प्रत्येक जण काराडून विरोध करत आहे. भाजप पक्ष कधीच आपल्या विचारांचा नव्हता अस बोललं जात आहे. त्याच अनुसरून रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक अकाउंट वरून पोस्ट केली आहे. त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.
रोहित पवार यांची फेसबुक पोस्ट –
छत्रपती या उपाधीवर संपुर्ण महाराष्ट्र मनापासून प्रेम करतो. त्या उपाधी मागे असणारा व्यक्ती नाही तर ती उपाधी मला महत्वाची वाटते.
अशा वेळी पक्षप्रवेशाचा कार्यक्रम मोदी साहेबांच्या उपस्थितीत होणार असल्याच सांगण्यात येत, पण तो कार्यक्रम एका नेत्यांच्या घराच्या पाठीमागे असणाऱ्या लॉनमध्ये आयोजित केला जातो. भारतीय जनता पक्षाला मला एकच सांगायच आहे, महाराष्ट्राचे नागरिक म्हणून व्यक्तीहून अधिक त्या उपाधीचा आम्ही मान ठेवला आहे.
कोणतही राजकारण न करता मी मनापासून अपेक्षा व्यक्त करतो की, जसा महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक तो मान ठेवतो तसाच आपणही तो मान ठेवावा.