आदिवासी कुटुंबातुन आलेले डॉ राजेंद्र भारुड आता आदिवासी बहुल जिल्ह्याचे जिल्हाधिकारी

मुंबई : सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ राजेंद्र भारूड यांची नंदुरबारचे जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नतीने बदली झाली आहे. धुळे जिल्ह्यातील आदिवासीबहुल तालुक्यातील सामोडे गावात जन्मलेल्या राजेंद्र भारूड यांची आदिवास बहुल नंदरूबार जिल्ह्यात पदोन्नतीपर बदली झाली आहे. आदिवासींचे जीवन जगलेल्या या गरिब कुटुंबीतून IAS पर्यंत भरारी घेतलेल्या मुलास आता आदिवासींच्या कल्याणासाठी काम करण्याची संधी मिळाली आहे. 

सन 2012 मध्ये आयएएस परीक्षा उत्तीर्ण झालेले राजेंद्र भारूड यांचा स्वप्न आज खऱ्या अर्थानं पूर्णत्वास आलं आहे. ‘मी एक स्वप्न पाहिलं’ या पुस्तकात लहानपणी कलेक्टर बनण्याचं स्वप्न गरीब भिल्ल समाजातील राजेंद्र गारूड यांनी पाहिल्याचं आपण वाचलं असेलच.

आता, नंदूरबारच्या जिल्हाधिकारीपदी बढतीपर नियुक्ती झाल्यामुळे त्यांचे हे स्वप्न पूर्णत्वास आले आहे. पाठिवर बिऱ्हाड घेऊन गावो-गावी भटकणाऱ्या भिल्ल समाजातील भारूड यांचे कुटुंब सामोड्यात स्थिरावले. त्यामुळे स्वत:च्या कुटुंबासह आजुबाजूला असणाऱ्या आदिवासी समाजाचं जगणं राजेंद्र यांनी जवळून अनुभवलंय. आदिवीसींच्या कुटुंबातच त्यांचं बालपण गेलंय.

त्यामुळे आता नंदूरबारसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्याचं प्रशासकीय नेतृत्व करण्याच भाग्य त्यांना त्यांच्या कर्तृत्वान मिळवून दिलंय. नक्कीच, राजेंद्र भारूड यांची नंदूरबारच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती ही नंदूरबारमधील आदिवीसींना ऊर्जा आणि प्रेरणा देणारी ठरेल.त्यांच्या कारकिर्दीला शुभेच्छा.!

ग्लोबल न्युज नेटवर्क: