मुंबई । महाराष्ट्राच्या राजकारणाच आजदेखील अभूतपूर्व राजकीय घडामोडी घडल्या. सकाळी सर्वोच्च न्यायालयात तिन्ही पक्षांकडून दाखल केलेल्या याचिकेवर निकाल आला. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिला. यामुळे कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या तीन पक्षांचे सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.
आघाडीच्या नेत्याची निवड करण्यासाठी मुंबईत तिन्ही पक्षांची बैठक सुरू आहे. या बैठकीत राज्यात आस्तिवात येणाऱ्या नव्या आघाडीचे नामकरण करण्यात आले. ‘महाराष्ट्र विकास आघाडी’ असे या नव्या आघाडाचे नाव असेल. तर उद्धव ठाकरे हे या नव्या आघाडाचे तसेच राज्याचे नेतृत्व करणार आहेत. आघाडीच्या बैठकीत यावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले.
यावेळी जयंत पाटील म्हणाले की, सगळ्यात कमी काळ मुख्यमंत्री राहण्याचा मान देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जातो. गेल्या काही दिवसांत जे घडलं ते जनतेने पाहायला मिळाला. महाराष्ट्राचा निकाल लागल्यावर 56, 54, 44 अशा गणिताची आकडेमोड सोशल मीडियात झाली. इतका वेळ का लागला, कधी सरकार होणार हे बोललं जात होतं.
सगळ्यांच्या मनात विचारांचे काहूर असायचं पण नेतृत्व कोण करणार याबाबत शरद पवारांनी ठरविले होतं. उद्धव ठाकरेंना मी वैयक्तिक कधीच भेटलो नव्हतो, पहिल्यांदा भेटलो तेव्हा कळालं ही व्यक्ती साधी आहे, सरळ आहे. हे सरकार किती वेळ टीकेल असं बोललं जातं पण किमान समान कार्यक्रम ठरविण्यासाठी वेळ गेला. ही आघाडी 5 वर्ष नाही तर 15 वर्ष टीकेल असा विश्वास आहे.