मुंबई । महाराष्ट्राच्या राजकारणाच आजदेखील अभूतपूर्व राजकीय घडामोडी घडल्या. सकाळी सर्वोच्च न्यायालयात तिन्ही पक्षांकडून दाखल केलेल्या याचिकेवर निकाल आला. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिला. यामुळे कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या तीन पक्षांचे सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.
आघाडीच्या नेत्याची निवड करण्यासाठी मुंबईत तिन्ही पक्षांची बैठक सुरू आहे. या बैठकीत राज्यात आस्तिवात येणाऱ्या नव्या आघाडीचे नामकरण करण्यात आले. ‘महाराष्ट्र विकास आघाडी’ असे या नव्या आघाडाचे नाव असेल.