‘तू इधर उधर कि न बात कर, ये बता कि काफिला क्यू लुटा! राऊतांच्या सोमय्यांना टोला

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्यातील महाविकास आघाडीचे अनेक मंत्र्यांवर आणि नेत्यांवर घोटाळ्याचे आरोप लगावले होते. तसेच सोमय्या यांच्या विधानानंतरच होणाऱ्या केंद्रीय तपास यंत्रणेच्या कारवाईवर संशय व्यक्त होत होता त्यातच भाजपाची सत्ता असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये स्मार्ट सिटीच्या घोटाळ्यावरून राऊत यांनी सोमय्यांना टोला लगावला आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये स्मार्ट सिटीच्या नावाखाली 500 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा झाल्याचा दावा राऊत यांनी केला आहे.परिणामी राज्याच्या राजकारणात सध्या राऊतांच्या पत्राची जोरदार चर्चा होताना दिसतेय. मला असं समजलय स्मार्ट सिटी प्रकल्पात 500 कोटींचा घोटाळा झाला आहे. आपण हा घोटाळा उघड करावा ही विनंती मी आपणाला पत्राद्वारे करतो आहे.

यावर सोमय्या म्हणाले कि, ‘मला कळत नाही की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे प्रवक्ते संजय राऊत यांचे आभार मानावे की आश्चर्य व्यक्त करावे? त्यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अविश्वास! त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या अकार्यक्षमतेसंदर्भात शंका उपस्थित केला आहे की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाबद्दल आस्था प्रदर्शित केली, हे आधी मला समजून घ्यायचे आहे. त्यासंदर्भात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी खुलासा करावा.’

Team Global News Marathi: