कोरोनाच्या संसर्गामुळे मुंबईत वाढत आहे मृत्यूदर
मागील तीन वर्षात मुंबईत विविध आजार, अपघात झालेले आणि नैसर्गिक मृत्यूच्या तुलनेत यावेळी कोरोनाच्या संकटामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. तसेच येणाऱ्या दिवसात ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता मुंबई मनपाकडून वर्तवली जात आहे
दरवर्षी मुंबईत ८० ते ९० हजार मृत्यू होतात. मात्र हा आकडा ऑगस्ट महिन्यांतच ७४ हजारांच्या घरात पोहचला आहे अशी माहिती बृहमुंबई महानगर पालिकेकडून देण्यात आली आहे. तर येणाऱ्या डिसेंबर महिन्यात हा आकडा एक लाखाच्यावर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मात्र मार्च महिन्यात आलेल्या कोरोनच्या संसर्गामुळे मुंबईत मृत्यूचे प्रमाणही वाढलेले दिसून आले आहे. या दरम्यान मृत्यूदर ६ टक्यांपेक्षा अधिक झाला आहे. यंदाच्या जानेवारीत ८३९७, फेब्रुवारी ७११६, मार्च ५७०३, एप्रिल ५५३७ पर्यंत असलेली मृत्युसंख्या झपाट्याने वाढून मेमध्ये ९१६१, जून १५७५६, जुलै ११७७० आणि ऑगस्टमध्ये १०२१५ पर्यंत पोहोचली आहे.