हाच का तुमचा लोकशाही कारभार? आशिष शेलारांची टीका म्हणाले ठाकरे सरकार’ बिघडले

मुंबई:वास्तूविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी  यांना करण्यात आलेल्या अटकेनंतर भाजपच्या  अनेक नेत्यांनी याबाबत जोरदार निषेध सुरु केला आहे. त्यात भाजप आमदार आणि माजी मंत्री आशिष शेलार  हे आघाडीवर असल्याचं दिसतं आहे. आशिष शेलार यांनी ट्विटरवरुन सरकारवर टीकेचा भडीमार सुरु केलेला आहेच मात्र, याशिवाय त्यांनी पत्रकार परिषद घेऊन देखील शिवसेनेवर निशाणा साधला आहे. 


अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर ठाकरे सरकारवर टीका करताना आशिष शेलार म्हणाले की, ‘काँग्रेसच्या सहवासात बिघडले ठाकरे सरकार.. हाच का तुमचा लोकशाही कारभार? दुर्दैवाने, लोकशाहीचा आजचा काळा दिवस… महाराष्ट्र आणिबाणीच्या दिशेने?’ असं ट्वीट आशिष शेलार यांनी केलं आहे.

यानंतर आशिष शेलार यांनी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी आशिष शेलार असं म्हणाले की, ‘नाईक परिवाराला न्याय मिळायलाच हवा…मात्र घटनाचक्र असे सांगतेय की, आपण केलेल्या कु-कृत्याला झाकण्यासाठी ठाकरे सरकार सुडबुध्दीने अर्नब गोस्वामी यांच्यावर कारवाई करतेय!’

ग्लोबल न्युज नेटवर्क: