जेव्हा जवळची व्यक्ती तुम्हाला त्रास देते किंवा सतत मन दुखवते, तेव्हा फक्त ही एक गोष्ट करा….

त्यामुळे गोष्टी बोलून दाखवण्यात शहाणपण आहे….वाचा सविस्तर

जेव्हा जवळची व्यक्ती तुम्हाला त्रास देते किंवा सतत मन दुखवते, तेव्हा फक्त ही एक गोष्ट करा….

माणसांच्या आयुष्यात सर्वात महत्वाच्या घटकांपैकी एक महत्वाचा घटक असेल तर तो आहे “नाती”….!! म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत की, जेव्हा आपल्या जवळची व्यक्ती किंवा मित्र आपले मन दुखावतात किंवा आपल्याला त्रास देते तेव्हा आपण काय करायचे. तर चला या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ. 

ज्यावेळी आपल्या जवळची व्यक्ती आपले मन दुखावते त्यावेळी आपल्याकडे दोन पर्याय असतात, “एक म्हणजे सहन करणे”, किंवा “बोलून टाकणे”. पण दुर्भाग्य असे की आपण बऱ्याचवेळा या गोष्टी सहन करत असतो, कारण आपल्याला भीती असते की मी जर समोरच्याला काही बोललो किंवा मी बोलले तर आमचे नाते तुटणार नाही ना?, आमचे संबंध तर बिघडणार नाही ना?, समोरचा माझ्यावर रागवेल त्यामुळे आपण शांतपणे गोष्टी सहन करत राहतो.

आपल्याला वाटते की समोरच्याला एक दिवस तरी जाणीव होईल, आणि तो बदलेल आणि तो ही एक दिवस मला समजून घेईल. चांगले दिवस येतील पण चांगले दिवस काही येत नाहीत आणि सारखे सहन करून-करून आपला त्रास वाढत जातो आणि परिस्थिती चिगळत जाते. मित्रांनो असे का होते याचे कारण म्हणजे, ज्यावेळेस आपण गोष्टी सहन करत जातो तेव्हा आपण समोरच्याला एक संधीच देत असतो की, ‘तुम्ही असेच वागत जा’….

‘आम्ही सहन करत जाऊ’….,’तुम्ही तुमची वाईट वागणूक चालू ठेवा’…. ‘आम्ही सहन करणे चालू ठेवतो’…,पण प्रत्येकाची सहन करण्याची एक क्षमता असते कोणाची थोडी असते..! कोणाची जास्त असते..! पण एक दिवस ही सहन शक्ती जेव्हा संपते तेव्हा परिणाम विस्फोटक होतात. आपले जवळचे नाते आपण गमावून बसतो, समोरच्याची वागणूक सहन केल्यामुळे आपली मानसिक स्थिती बिघडते आरोग्यावर परिणाम होतो म्हणजे सांगायचे झाले तर सहन करणे हा पर्याय नाही पण जेव्हा आपण सहन करण्याऐवजी समोरच्याला बोलून दाखवतो.

तेव्हा तुम्हाला स्वतःबद्दल आदर आहे हे सिद्ध होते. समजा तुम्ही एका कंपनीचे मालक आहात आणि तुमचा एक कामगार रोज उशिरा कामाला येतो तेव्हा तुम्ही बोलत नाही सहन करत राहता…. तेव्हा तुम्ही कामगाराला संदेश देत असता की, तुमच्या कंपनीत उशिरा आले की चालते आणि मग सहन केल्यामुळे समोरचा कामगार जास्त उशीर करायला लागतो आणि मग वैतागून शेवटी तुम्हाला त्याला कामावरून काढावे लागते. पण ज्यावेळेस तुम्ही त्याला बोलता की, आपल्या कंपनीमध्ये सर्व वेळेवर येतात तू सुद्धा आले पाहिजे…!

तेव्हा कामगाराला समजते आणि तो वेळेवर यायला सुरुवात करतो. आणि तुमचे नुकसान होत नाही. समजा तुमच्या घरासमोर कोणी कचरा टाकला आणि तुम्ही ते सहन करत राहिला तर लोकांना तुम्ही संदेश पाठवता की तुमच्या घरासमोर कचरा टाकलेला चालतो…! आणि मग लोक तुमच्या घरासमोर कचरा टाकत जातात आणि तुम्ही सहन करत असल्यामुळे तुमच्या घरासमोर कचऱ्याचा ढीग होतो त्यामुळे वेळीच जर तुम्ही त्यांना बोललात तर ही वेळ येणार नाही.

म्हणून जर तुम्हाला तुमचे मन दुखण्यापासून वाचवायचे असेल तर ते गोष्टी सहन करण्यात नसून गोष्टी बोलून दाखवण्यात आहे. पण आम्ही मगाशी सांगितल्या प्रमाणे, आपण गोष्टी सहन करत राहतो… कारण आपल्याला भीती असते की, आपले संबंध बिघडणार तर नाही ना… पण त्यावरती सहन करणे हा पर्याय नसून बोलणे हा उपाय आहे. ज्यावेळेस आपल्याला एकाद्या डॉक्टर चा गुण येत नाही तेव्हा आपण डॉक्टर ला बोलून दाखवतो की, गुण आला नाही..! आणि मग डॉक्टर सुद्धा लगेच त्याची ट्रीटमेंट बदलतो. पण जर आपण बोललो नाही तर डॉक्टर तीच ट्रीटमेंट चालू ठेवेल त्यामुळे आपला आजार अजून वाढेल आणि आपल्याला धोका देखील असतो. त्यामुळे गोष्टी बोलून दाखवण्यात शहाणपण आहे.

म्हणून तुमच्या आयुष्यात जर तुम्हाला कोणाच्या वागणुकीमुळे, शब्दांमुळे किंवा अन्य कोणत्याही गोष्टीमुळे त्रास होत असेल तर आपण ते सहन करायचे नाही बोलून दाखवायचे. पण ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्याला बोलून दाखवता तेव्हा त्यासाठी एक मोठी अट लागू होते, ती म्हणजे आपल्याला आपले म्हणणे त्या समोरच्याच्या आत दडलेल्या माणसाला सांगायचे असते ज्याला ‘भावना’ माहीत आहेत. एखाद्याच्या आत मधला माणूस जर आपल्याला जागा करायचा असेल तर त्याला एकच मार्ग आहे तो म्हणजे “प्रेम आणि आदर”…!!

तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीला सांगायचे असेल तर तुम्हाला काळजी घेतली पाहिजे त्यासाठी तुम्ही त्याला प्रेमाने आणि आदराने सांगितले पाहिजे. कारण माणूस फक्त प्रेम आणि आदराची भाषा समजतो, काही अपवाद सोडला तर…..!! जेव्हा तुम्ही तुमचा संदेश समोरच्याला प्रेमाने आणि आदराने सांगता तेव्हाच तुम्ही समोरच्या बरोबर जोडले जाता.

साभार शहाणपण यु ट्यूब चॅनल

ग्लोबल न्युज नेटवर्क: