“हे कसले आपडो सरकार, हे तर थापडो सरकार” भाजपचा शिवसेनेला टोला

“हे कसले आपडो सरकार, हे तर थापडो सरकार” भाजपचा शिवसेनेला टोला

महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजराती मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिवसेना पक्षातर्फे गुजराती मतदारांचा मेळावा येत्या १० जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी “मुंबई मा जिलेबी फाफडो, उद्धव ठाकरे आपडो” असं घोषवाक्य तयार करण्यात आले आहे, त्यावरून भाजपा आणि शिवसेना यांच्यात राजकारण रंगले आहे.

यावर आता भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले की, न्यायालयाकडून सरकारमधील विविध मंत्र्यांना व राज्य सरकारला विविध प्रकरणात गेले वर्षभर मिळत असलेल्या थपडा आणि जनतेला राज्यातील आघाडी सरकारांकडून मिळत असलेल्या आश्वासनाच्या थापा पहात असतां हे आघाडीचे सरकार जनतेसाठी आपडो सरकार नसून थपडा खाणारे व थापा मारणारे थापडो सरकार झाले आहे असा टोला त्यांनी लगावला.

न्यायालयाने दिलेल्या थापडाची संख्या मग ते मंत्र्यावर असो की विविध प्रकरणावर ती संख्या वाढतंच आहे. मंत्री विजय वड्डेवारीवार यांचा पासपोर्ट खोटी माहिती दिली म्हणून जप्त केला गेला. अन्य एक मंत्री यशोमती ठाकूर यांना झालेली शिक्षा, नियमबाह्य पध्दतीने परवानग्या दिल्या म्हणून वर्षा गायकवाड यांचा निर्णय बेकायदेशीर ठरविण्याचा आलेला निर्णय ताजा आहे, त्याशिवाय पदवी परिक्षा, ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमणूक, मेट्रो कारशेड, अर्णब गोस्वामी, कंगना राणौत प्रकरणात न्यायालयाकडून सरकारला मिळालेल्या थपडा तसेच मराठा आरक्षणाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात आलेले अपयश ही सुध्दा थप्पडच आहे असंही भाजपाने सांगितले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: